शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

पंतप्रधान म्हणतात भारतीय तरूणांचे उज्वल भविष्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच

By admin | Updated: May 11, 2017 19:52 IST

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी स्वत:ला संलग्न करण्यातच भारतीय तरूणांचे भवितव्य उज्वल ठरणार आहे, असे स्वप्नरंजन नुकतेच पंतप्रधानांनी ऐकवले मात्र भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र

सुरेश भटेवरा/ ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 : माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी स्वत:ला संलग्न करण्यातच भारतीय तरूणांचे भवितव्य उज्वल ठरणार आहे, असे स्वप्नरंजन नुकतेच पंतप्रधानांनी ऐकवले मात्र भारतातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आजवरच्या सर्वाधिक कठीण संकटाशी सध्या झुंज देत आहे. या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची मोठया प्रमाणात कपात सुरू केली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस होत असलेले आॅटोमेशन आणि अमेरिकन हायरींगसाठी मोजावे लागणारे अधिक वेतन यामुळे नोकर कपातीचा आकडा वाढतच जाणार असून साऱ्या आयटी क्षेत्रावर मंदी आणि निराशेचे सावट आहे.डिजिटल इंडिया हा पंतप्रधान मोदींचा स्वप्नांकित प्रकल्प (ड्रीम प्रोजेक्ट). याच मालिकेत सुप्रिम कोर्टाला पेपरलेस बनवणाऱ्या इंटिग्रेटेड केस मॅनेजमेंट या आधुनिक व्यवस्थेचा शुभारंभ करतांना पंतप्रधानांनी नुकताच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) + इंडियन टॅलंट (आयटी) = इंडिया टुमारो (आयटी). हा नवा मंत्र देशातल्या तरूणांना दिला. या मंत्राव्दारे पंतप्रधानांनी तरूणांना आशेचा किरण दाखवला तरी प्रत्यक्षात या क्षेत्राची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. याची मुख्य कारणे दोन. पहिले अमेरिका, युरोपियन देश, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर इत्यादी देशात स्थानिक बेरोजगारीचे कारण पुढे करीत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारतीय इंजिनिअर्सना सध्या टार्गेट केले जात आहे. तर दुसरे कारण प्रगत तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात आॅटोमेशनचे प्रमाण वाढले असल्याने पूर्वी जे काम करण्यासाठी १00 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची गरज होती तेच काम आता कुठे १0 तर कुठे केवळ एक इंजिनिअर देखील पुरे करू शकतो अशी स्थितीआहे. पंतप्रधानांचा नवा मंत्र तरूणांना आयटी क्षेत्राची भुरळ घालणारा असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका ताज्या संशोधनानुसार २0२0 पर्यंत आयटी क्षेत्रात भारतातल्या २0 ते ३0 टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपले रोजगार गमवावे लागणार आहेत. तरूण पिढीला बौध्दिक क्षेत्रात लवकरच नवे तळ शोधावे लागतील, अशी जाणीव या क्षेत्रातल्या जाणकार तज्ज्ञांनीही करून दिली आहे. नवे शतक उजाडल्यापासून गेल्या सोळा वर्षात तरूण पिढीला सर्वाधिक नोकऱ्या व रोजगार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानेच पुरवल्या. २0२0 उजाडायला अद्याप ३ वर्षे बाकी आहेत, तरीही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतातल्या नामांकित कंपन्यांनी आपल्या नोकऱ्यांमधे आजच मोठया प्रमाणावर कपात सुरू केली आहे. जसजसे आॅटोमेशनचे प्रमाण वाढत जाईल, या क्षेत्रातल्या रोजगारांमधे व्यापक कपात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.आयटी क्षेत्रातल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना मोठया संख्येत रोजगार पुरवणाऱ्या कॉग्निजंट कंपनीने गेल्याच सप्ताहात आपल्या १ हजार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती (व्हॉलंटरी सेपरेशन)साठी प्रवृत्त केले लवकरच ही संख्या ६ हजारांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. खर्चात कपात करण्यासाठी विप्रो व इन्फोसिसने देखील आपल्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स रिव्हयु गांभीर्याने सुरू केला आहे. विप्रो लवकरच आपल्या ६00 कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे याखेरीज विप्रोच्या २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लवकरच कपातीला सामोरे जावे लागणार आहे. इन्फोसिसने कामकाजात अल्प कौशल्य दाखवणाऱ्या १0 टक्के कर्मचाऱ्यांची यादी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावण्याच्या भीतीने ग्रासले आहे.