शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:01 IST

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली/अहमदाबाद : साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदींनी मिनी रोड शो केला. आपल्या कारच्या फूटबोर्डवर उभे राहून ते ३०० मीटरहून अधिक अंतर लोकांना हात दाखवत गेले. मोदींनी कारच्या फूटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती आणि भाजपचे झेंडेही त्यावेळी फडकावले जात होते. ही सर्व दृश्ये सर्व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली.त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत व प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊ न नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुजरातमध्ये मतदानानंतर पंतप्रधान लगेच रोड शो करीत असतील, तर त्याबद्दल निवडणूक आयोग काही कारवाई करणार का, असा सावल त्या दोघांनी केला. संकेत व नियम लोकांच्या डोळ्यादेखत पायदळी तुडवले जात आहेत, असे सांगून अशोक गहलोत म्हणाले की, मोदींनी आचारसंहितेचे उघड उल्लंघन केले असून, त्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. गुजरातमध्ये पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने हताश झालेले भाजप नेते असे प्रकार करीत आहेत, असा टोला लगावून रणदीप सूरजेवाला म्हणाले की, हे सारे दिसत असूनही निवडणूक आयोग त्याबद्दल पंतप्रधानांकडे विचारणाही करताना दिसत नाही. निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे आणि भाजपने आयोगाला ओलीसच ठेवले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विमानतळावरील पत्रकार परिषदेवरही निवडणूक आयोगाने सोयिस्कर मौन बाळगले, असा आरोप सूरजेवाला यांनी केला. निवडणूक आयोग देशाच्या राज्यघटनेकडेच दुर्लक्ष करीत असल्याची टीका करून ते म्हणाले की, राहुल गांधींच्या टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग अर्ध्या तासात कारवाई करते; पण मोदींचा रोड शो सर्वत्र दिसत असतानाही आयोग गप्प राहतो.चिदम्बरम यांचाही हल्लाबोलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका केली. राहुल गांधी यांना टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग नोटीस बजावतो; पण पंतप्रधान रोड शोद्वारे मतदानाच्या दिवशी प्रचार करतात, रेल्वेमंत्री व भाजपचे अध्यक्ष दिल्ली व अहमदाबाद विमानतळावर पत्रकार परिषद घेतात, याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्याविरुद्ध साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही, याचा उल्लेख करीत चिदम्बरम यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017