शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:01 IST

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली/अहमदाबाद : साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदींनी मिनी रोड शो केला. आपल्या कारच्या फूटबोर्डवर उभे राहून ते ३०० मीटरहून अधिक अंतर लोकांना हात दाखवत गेले. मोदींनी कारच्या फूटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती आणि भाजपचे झेंडेही त्यावेळी फडकावले जात होते. ही सर्व दृश्ये सर्व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली.त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत व प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊ न नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुजरातमध्ये मतदानानंतर पंतप्रधान लगेच रोड शो करीत असतील, तर त्याबद्दल निवडणूक आयोग काही कारवाई करणार का, असा सावल त्या दोघांनी केला. संकेत व नियम लोकांच्या डोळ्यादेखत पायदळी तुडवले जात आहेत, असे सांगून अशोक गहलोत म्हणाले की, मोदींनी आचारसंहितेचे उघड उल्लंघन केले असून, त्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. गुजरातमध्ये पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने हताश झालेले भाजप नेते असे प्रकार करीत आहेत, असा टोला लगावून रणदीप सूरजेवाला म्हणाले की, हे सारे दिसत असूनही निवडणूक आयोग त्याबद्दल पंतप्रधानांकडे विचारणाही करताना दिसत नाही. निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे आणि भाजपने आयोगाला ओलीसच ठेवले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विमानतळावरील पत्रकार परिषदेवरही निवडणूक आयोगाने सोयिस्कर मौन बाळगले, असा आरोप सूरजेवाला यांनी केला. निवडणूक आयोग देशाच्या राज्यघटनेकडेच दुर्लक्ष करीत असल्याची टीका करून ते म्हणाले की, राहुल गांधींच्या टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग अर्ध्या तासात कारवाई करते; पण मोदींचा रोड शो सर्वत्र दिसत असतानाही आयोग गप्प राहतो.चिदम्बरम यांचाही हल्लाबोलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका केली. राहुल गांधी यांना टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग नोटीस बजावतो; पण पंतप्रधान रोड शोद्वारे मतदानाच्या दिवशी प्रचार करतात, रेल्वेमंत्री व भाजपचे अध्यक्ष दिल्ली व अहमदाबाद विमानतळावर पत्रकार परिषद घेतात, याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्याविरुद्ध साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही, याचा उल्लेख करीत चिदम्बरम यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017