शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार नाहीत, व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:41 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.राज्यसभेचे कामकाज याच मुद्यावर दुपारी दोनपर्यंत दोन वेळा तर लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. मुख्य विरोधी पक्षाने सभात्यागही केला. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून माफी मागण्यावरून काँग्रेसने दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरूच ठेवला आहे. बुधवारी काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. पहिला होता तो या मुद्यावर एकत्र आलेले विरोधक विस्कळीत झाले तेव्हा. मोदी यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा द्यायला समाजवादी पक्षाने नकार दिला. दुसरीकडे सरकार काही बोलणार मोदी यांनी सभागृहात आरोप केले नसल्याने त्यांनी माफी मागावी, अशी सूचना करता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याच्या उद्देशाने काँग्रेससह इतर पक्ष आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते त्यावेळी नायडू यांनी स्वत:हूनच वरील निर्णय जाहीर केला. नायडू कडक व कठोर शब्दांत म्हणाले की ही काही पद्धत नाही. तिकडे लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसची माफी मागण्याची मागणी साफ फेटाळून लावली व काँग्रेसकडे काही मुद्दाच उरलेला नाही, ते सभागृहाला जबरदस्तीने विस्कळीत करीत आहेत, असा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही मोदी यांच्याकडून खुलासा मागत आहोत, असे म्हटले. काँग्रेसची भूमिका मवाळ झाली याचे कारण असे की लोकसभेत मोदी उपस्थित होते. काँगे्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत पक्षाचे सदस्य सभागृहात गोंधळ घालत होते व मनमोहनसिंग यांची माफी मागावी, अशा घोषणा देत होते. परंतु समोर बसलेल्या मोदी यांच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता.आरोप मागे घ्या-भाजपचा आक्रमक पवित्रा आणि विरोधकांच्या एकीत पडलेली फूट पाहून काँग्रेसने आपल्या माफी मागण्याच्या मागणीवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सकाळपर्यंत माफी मागण्याच्या अटीवर अडलेला काँग्रेस पक्ष सायंकाळी आम्ही पंतप्रधानपदाचा सन्मान करतो परंतु मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे की त्यांनी गुजरातेत निवडणूक जिंकण्यासाठी आरोप केले होते व आता ते मी परत घेत आहे, असे म्हणण्यापर्यंत आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान