शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार नाहीत, व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:41 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.राज्यसभेचे कामकाज याच मुद्यावर दुपारी दोनपर्यंत दोन वेळा तर लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. मुख्य विरोधी पक्षाने सभात्यागही केला. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून माफी मागण्यावरून काँग्रेसने दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरूच ठेवला आहे. बुधवारी काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. पहिला होता तो या मुद्यावर एकत्र आलेले विरोधक विस्कळीत झाले तेव्हा. मोदी यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा द्यायला समाजवादी पक्षाने नकार दिला. दुसरीकडे सरकार काही बोलणार मोदी यांनी सभागृहात आरोप केले नसल्याने त्यांनी माफी मागावी, अशी सूचना करता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याच्या उद्देशाने काँग्रेससह इतर पक्ष आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते त्यावेळी नायडू यांनी स्वत:हूनच वरील निर्णय जाहीर केला. नायडू कडक व कठोर शब्दांत म्हणाले की ही काही पद्धत नाही. तिकडे लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसची माफी मागण्याची मागणी साफ फेटाळून लावली व काँग्रेसकडे काही मुद्दाच उरलेला नाही, ते सभागृहाला जबरदस्तीने विस्कळीत करीत आहेत, असा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही मोदी यांच्याकडून खुलासा मागत आहोत, असे म्हटले. काँग्रेसची भूमिका मवाळ झाली याचे कारण असे की लोकसभेत मोदी उपस्थित होते. काँगे्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत पक्षाचे सदस्य सभागृहात गोंधळ घालत होते व मनमोहनसिंग यांची माफी मागावी, अशा घोषणा देत होते. परंतु समोर बसलेल्या मोदी यांच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता.आरोप मागे घ्या-भाजपचा आक्रमक पवित्रा आणि विरोधकांच्या एकीत पडलेली फूट पाहून काँग्रेसने आपल्या माफी मागण्याच्या मागणीवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सकाळपर्यंत माफी मागण्याच्या अटीवर अडलेला काँग्रेस पक्ष सायंकाळी आम्ही पंतप्रधानपदाचा सन्मान करतो परंतु मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे की त्यांनी गुजरातेत निवडणूक जिंकण्यासाठी आरोप केले होते व आता ते मी परत घेत आहे, असे म्हणण्यापर्यंत आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान