शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:23 IST

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर शुक्रवारी रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. त्यांच्यासह ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडूनही ते प्रत्येक घडामोडींची माहिती घेत होते.

भारतातील मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या बालासोर अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनी बचाव कार्यात सहभागी सर्व मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयात तातडीने बैठक घेतली. संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून संरक्षण मंत्रालय आणि एनडीआरएफला मदतकार्यात रात्रीच तातडीने सहभागी होण्याचे आदेश दिले. त्यामुळे शनिवारची सुटी असतानाही सर्व अधिकारी- कर्मचारी रात्रभर बचावकार्यात सहभागी झाले होते. या सर्व घडामोडींची प्रत्येक माहिती पंतप्रधान जाणून घेत होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी सकाळ होताच बालासोरला जाणार होते; परंतु, त्यांच्या दौऱ्यामुळे बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी दुपारी घटनास्थळाचा दौरा केला. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी