शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

ऐतिहासिक! लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; मोदींकडून पोस्टाचे तिकीटही जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 23:02 IST

भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केलं. याशिवाय त्यांनी शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त (Guru Tegh Bahadur Parkash Purab) टपाल तिकिटही जारी केलं. “आज मला गुरूंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि याला मी गुरूंची माझ्यावर असलेली कृपा मानतो,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“आज आपला देश संपूर्ण निष्ठेने आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरूंना नमन करतो. तसंच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरूवाणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो,” असं मोदी यावेळी म्हणाले. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

“भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नवीन विचार, सतत मेहनत आणि समर्पण ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हाच देशाचा हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिक गोष्टींवर अभिमान असायला हवा आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला निर्माण करायचा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.सूर्यास्तानंतर भाषणसूयास्तानंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच किल्ल्यावरुन मुघल शासक औरंगजेबने १६७५ मध्ये शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांचे शीर कापण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच, तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याचे ठिकाण नियोजित करण्यात आले होते. लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन देशाचे पंतप्रधान केवळ स्वातंत्र्यदिनीच देशाला संबोधित करत असतात. मात्र, त्यानंतर पुन्हा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्यात येत नाही. स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानांनी या ऐतिहासिक स्थळावरुन भाषण दिलं.

दरम्यान, यापूर्वी मोदींनी २०१८ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा केला होता. त्यावेळी, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तर, सकाळी ९ वाजता त्यांनी भाषण केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाdelhiदिल्ली