शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

ऐतिहासिक! लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; मोदींकडून पोस्टाचे तिकीटही जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 23:02 IST

भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी लाल किल्ल्यावरून ४०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केलं. याशिवाय त्यांनी शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त (Guru Tegh Bahadur Parkash Purab) टपाल तिकिटही जारी केलं. “आज मला गुरूंना समर्पित स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्याचं भाग्य लाभलं आहे आणि याला मी गुरूंची माझ्यावर असलेली कृपा मानतो,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“आज आपला देश संपूर्ण निष्ठेने आपल्या गुरुंच्या आदर्शांवर पुढे जात आहे. या पुण्यदिनी मी सर्व गुरूंना नमन करतो. तसंच सर्व देशवासीयांना आणि संपूर्ण जगातील गुरूवाणीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मी प्रकाश पर्वाबद्दल अभिनंदन करतो,” असं मोदी यावेळी म्हणाले. ही भारतभूमी केवळ एक देश नाही नाही तर मोठा वारसा आणि परंपरा आहे. याला हे आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो वर्षांच्या तपश्चर्येने आणि त्यांच्या विचारांना समृद्ध केले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

“भारतानं कधीही कोणत्या देशासाठी किंवा समाजासाठी धोका निर्माण केला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नवीन विचार, सतत मेहनत आणि समर्पण ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हाच देशाचा हा संकल्प आहे. आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिक गोष्टींवर अभिमान असायला हवा आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला निर्माण करायचा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.सूर्यास्तानंतर भाषणसूयास्तानंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच किल्ल्यावरुन मुघल शासक औरंगजेबने १६७५ मध्ये शीख समुदायाचे नववे गुरू, गुरू तेज बहादूर यांचे शीर कापण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच, तेज बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याचे ठिकाण नियोजित करण्यात आले होते. लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन देशाचे पंतप्रधान केवळ स्वातंत्र्यदिनीच देशाला संबोधित करत असतात. मात्र, त्यानंतर पुन्हा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्यात येत नाही. स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानांनी या ऐतिहासिक स्थळावरुन भाषण दिलं.

दरम्यान, यापूर्वी मोदींनी २०१८ मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा ७५ वा स्थापना दिवस साजरा केला होता. त्यावेळी, लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. तर, सकाळी ९ वाजता त्यांनी भाषण केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाdelhiदिल्ली