शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौभाग्य योजनेचं केलं अनावरण, आता गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 20:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार असून, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू आहे. एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय आहे. देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले आहेत. आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले. सौभाग्य योजनेचा देशातील अडीच कोटी लोकांना फायदा होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आलेकाही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होतीआज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्तदेशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केलेप्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देणार, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन देणार2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाहीहर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज देणारगरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणारस्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदूगरिबांचं कल्याण ही सरकारची ओळखएक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येयदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी