शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौभाग्य योजनेचं केलं अनावरण, आता गरिबांना मोफत वीजजोडणी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 20:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. शहर आणि गावातील गरिबांना या योजनेचा फायदा मिळणार असून, जिथे वीज नाही तिथे सोलर पॅक देणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. सोलर पॅकमध्ये 5 लेड बल्ब, बॅटरी आणि एक पंखा दिला जाणार आहे. 31 मार्च 2019पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यासाठी सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचवण्यात येणार आहे. प्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देण्यात येणार असून, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन पुरविणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदू आहे. एक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. 9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येय आहे. देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आले आहेत. आज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्त आहे. काही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होती, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केले. सौभाग्य योजनेचा देशातील अडीच कोटी लोकांना फायदा होणार असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात देशात 26 कोटींहून अधिक एलईडी बल्ब वाटण्यात आलेकाही वर्षांपूर्वी देशात कोळशाचा तुटवडा होता, परिस्थिती हाताबाहेर गेली होतीआज देशात पुरेशी वीज उपलब्ध आहे, कोळश्याचं उत्पादन यूपीए सरकारपेक्षा दीडपट जास्तदेशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी एकाच वेळी चार स्तरांवर काम केलेप्रत्येक घरात 1 एलईडी बल्ब, मोबाईल चार्जिंग कनेक्शन देणार, प्रत्येक गावात कॅम्प घेऊन वीज कनेक्शन देणार2011च्या जनगणेनुसार वीज नसलेल्या घरांमध्ये वीज देणार, वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाहीहर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' 31 मार्च 2019 पर्यंत देशातल्या सर्व घरांमध्ये वीज देणारगरिबांना मोफत वीज कनेक्शन, सरकार 16 हजार कोटी रुपये खर्च करणारस्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी घरांमध्ये वीज नाही सरकारच्या प्रत्येक योजनेत गरीब हाच केंद्रबिंदूगरिबांचं कल्याण ही सरकारची ओळखएक रुपयाही न घेता गरिबांना वीज जोडणी देण्यात येणार9 कोटी लोकांना साडेतीन लाख कोटींचं विनागॅरंटी कर्ज दिलं, गरिबांच्या अडचणी दूर करणं हे आमचं ध्येयदेशात 4 कोटी घरांमध्ये आजही वीज नाही, जवळपास 20 टक्के नागरिक अंधारात 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी