शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 05:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अजून व्हायच्याच आहेत, पण विरोधी पक्षांचे नेतेही ‘एनडीए सरकार चारसौ पार’च्या घोषणा देत आहेत. आपल्याला आतापासूनच देश-विदेशातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची निमंत्रणे आली आहेत. याचा अर्थ विरोधकांप्रमाणेच केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येईल याविषयी जगातील विविध देशांनाही पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ‘सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही...’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

विकसित भारताच्या संकल्पात पुढील पाच वर्षे भूमिका निर्णायक ठरणार आहे. या कालखंडात भारताला पूर्वीपेक्षा अनेक पट वेगाने काम करून मोठी झेप घ्यायची आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक अनेक पटींनी, चार दिशांनी विस्तार करणे असा या संकल्पाचा अर्थ आहे. या सर्व लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी भाजपचे सत्तेत पुनरागमन होणे आवश्यक आहे. ‘एनडीए सरकार, चारसौ पार’साठी भाजपला ३७० चा मैलाचा दगड पार करावाच लागेल, असे मोदी प्रगती मैदानावरील भारत मंडपम् येथे राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी म्हणाले.

राजकारणासाठी नव्हे, तर राष्ट्रनीतीसाठी...

एनडीए सरकारचा १० वर्षांचा कलंकरहित कार्यकाळ आणि २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढणे ही सामान्य कामगिरी नाही. आम्ही देशाला महाघोटाळे, अतिरेकी हल्ल्यांपासून मुक्ती दिली. गरीब आणि मध्यम वर्गाचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला.

आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सत्तेचा आनंद घेतला नाही, तर आपली मोहीम सुरू ठेवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेताना मी आपल्या सुख-वैभवासाठी जगणारी व्यक्ती नाही. 

सत्ता उपभोगासाठी आपण तिसरी टर्म मागत नाही. राष्ट्रसंकल्पासाठी अनेक निर्णय घ्यायचे शिल्लक आहेत. स्थिरता, घराणेशाही आणि तुष्टीकरणाची जननी, अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्ला चढविला. 

प्रत्येकापर्यंत माझा नमस्कार पोहोचवा!

भाजप कार्यकर्ते वर्षाचा प्रत्येक दिवस, २४ तास देशाची सेवा करीत असतात. आज १८ फेब्रुवारी आहे. १८ वर्षे पूर्ण केलेले नवे तरुण १८ व्या लोकसभेत मतदान करतील.

पुढील शंभर दिवसांत कार्यकर्त्यांनी नवी ऊर्जा, उत्साह, जोश आणि विश्वासाने प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ-परंपरेपर्यंत प्रत्यक्षात पोहोचावे.

नमो ॲपच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत माझे पत्र आणि नमस्कार पोहोचवावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

पुढील १ हजार वर्षे देशात ‘रामराज्य’

अधिवेशनात रविवारी अयोध्येतील राम मंदिराबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. राम मंदिरामुळे पुढील १,००० वर्षांसाठी भारतात 'रामराज्या'ची स्थापना होईल. राम मंदिर ‘राष्ट्रीय जाणिवेचे’ मंदिर बनले आहे आणि ‘विकसित भारत’ उभारणीसाठी घेतलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यात निर्णायक भूमिका बजावेल. ‘भाजपचे हे अधिवेशन प्रभू श्रीरामाचा अभिषेक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करते’, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी