शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही... भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणण्याचा पंतप्रधानांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 05:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका अजून व्हायच्याच आहेत, पण विरोधी पक्षांचे नेतेही ‘एनडीए सरकार चारसौ पार’च्या घोषणा देत आहेत. आपल्याला आतापासूनच देश-विदेशातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची निमंत्रणे आली आहेत. याचा अर्थ विरोधकांप्रमाणेच केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येईल याविषयी जगातील विविध देशांनाही पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ‘सारी दुनिया जानती है, आयेगा तो मोदीही...’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनात पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

विकसित भारताच्या संकल्पात पुढील पाच वर्षे भूमिका निर्णायक ठरणार आहे. या कालखंडात भारताला पूर्वीपेक्षा अनेक पट वेगाने काम करून मोठी झेप घ्यायची आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक अनेक पटींनी, चार दिशांनी विस्तार करणे असा या संकल्पाचा अर्थ आहे. या सर्व लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी भाजपचे सत्तेत पुनरागमन होणे आवश्यक आहे. ‘एनडीए सरकार, चारसौ पार’साठी भाजपला ३७० चा मैलाचा दगड पार करावाच लागेल, असे मोदी प्रगती मैदानावरील भारत मंडपम् येथे राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी म्हणाले.

राजकारणासाठी नव्हे, तर राष्ट्रनीतीसाठी...

एनडीए सरकारचा १० वर्षांचा कलंकरहित कार्यकाळ आणि २५ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढणे ही सामान्य कामगिरी नाही. आम्ही देशाला महाघोटाळे, अतिरेकी हल्ल्यांपासून मुक्ती दिली. गरीब आणि मध्यम वर्गाचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला.

आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रनीतीसाठी निघालो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सत्तेचा आनंद घेतला नाही, तर आपली मोहीम सुरू ठेवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेताना मी आपल्या सुख-वैभवासाठी जगणारी व्यक्ती नाही. 

सत्ता उपभोगासाठी आपण तिसरी टर्म मागत नाही. राष्ट्रसंकल्पासाठी अनेक निर्णय घ्यायचे शिल्लक आहेत. स्थिरता, घराणेशाही आणि तुष्टीकरणाची जननी, अशा शब्दात मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्ला चढविला. 

प्रत्येकापर्यंत माझा नमस्कार पोहोचवा!

भाजप कार्यकर्ते वर्षाचा प्रत्येक दिवस, २४ तास देशाची सेवा करीत असतात. आज १८ फेब्रुवारी आहे. १८ वर्षे पूर्ण केलेले नवे तरुण १८ व्या लोकसभेत मतदान करतील.

पुढील शंभर दिवसांत कार्यकर्त्यांनी नवी ऊर्जा, उत्साह, जोश आणि विश्वासाने प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ-परंपरेपर्यंत प्रत्यक्षात पोहोचावे.

नमो ॲपच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत माझे पत्र आणि नमस्कार पोहोचवावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

पुढील १ हजार वर्षे देशात ‘रामराज्य’

अधिवेशनात रविवारी अयोध्येतील राम मंदिराबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. राम मंदिरामुळे पुढील १,००० वर्षांसाठी भारतात 'रामराज्या'ची स्थापना होईल. राम मंदिर ‘राष्ट्रीय जाणिवेचे’ मंदिर बनले आहे आणि ‘विकसित भारत’ उभारणीसाठी घेतलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यात निर्णायक भूमिका बजावेल. ‘भाजपचे हे अधिवेशन प्रभू श्रीरामाचा अभिषेक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करते’, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी