शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:01 IST

विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते असं मोदींनी म्हटलं होते.

नवी दिल्ली - अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. टॉप इकोनॉमिक बॉडीची मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि अमेरिकेकडून लावण्यात आलेला २५ टक्के टॅरिफ यावरून आर्थिक सल्लागार परिषदेत आढावा घेतला जाणार आहे. पंतप्रधान निवासस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह ७ केंद्रीय मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. 

एकीकडे चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी आजपासून २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी बोलवलेल्या या बैठकीला महत्त्व आले आहे. एस जयशंकर रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी ही बैठक होत आहे. अमेरिकेसोबत बिघडलेल्या व्यापारी संबंधांमुळे भारत बीजिंग आणि मॉस्कोसोबत आपले संबंध वाढवण्यावर भर देत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्याशिवाय रशियाकडून भारताने तेल खरेदी सुरूच ठेवली तर २७ ऑगस्टपासून हा टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के करण्याचा इशारा दिला आहे. या टॅरिफमुळे दागिने, कपडे, बूटसारख्या ४० अब्ज अमेरिकन डॉलरच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वॉशिंग्टनहून नवी दिल्लीला येणाऱ्या व्यापारी शिष्टमंडळ भेटीला स्थगिती मिळाल्याने प्रस्तावित भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार (BTA) वरील चर्चेचा सहावा टप्पा स्थगित करण्यात आला होता. ही चर्चा २५ ते २९ ऑगस्ट या काळात होणार होती. आता ही भेट पुन्हा नियोजित होण्याची शक्यता आहे असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अमेरिका कृषी आणि दुग्धव्यवसाय यांसारखी संवेदनशील क्षेत्रे उघडण्यासाठी भारतावर दबाव टाकत आहे. मात्र भारत सरकार यासाठी स्पष्ट नकार देत आहे. जर असे झाले तर भारतातील छोटे शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पादनाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. 

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला. भारताला सामर्थ्यवान, आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनवण्याची जिद्द, सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याची आकांक्षा आणि देशाला नवीन युगात घेऊन जाण्याचा ठाम निर्धार मोदींनी व्यक्त केला. विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते. याचाच अर्थ दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ही एक वाईट सवय आहे. ही सवय राष्ट्रासाठी खूप धोकादायक ठरू शकते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प