शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 06:24 IST

स्मारकावरील आपल्या वास्तव्यादरम्यान पंतप्रधानांनी ध्यान लावले तसेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यास ‘अर्घ्य’ दिले.

कन्याकुमारी (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विवेकानंद शीळा स्मारकावरील ४५ तासांची ध्यान साधना शनिवारी पूर्ण केली. तमिळ संतकवी तिरुवल्लुवर यांना पुष्पांजली वाहून त्यांनी ध्यान साधनेची पूर्णाहुती केली. ध्यान साधना संपल्यानंतर शुभ्र वस्त्रे परिधान करून मोदी यांनी स्मारकापासून जवळच असलेल्या तिरुवल्लुवर यांच्या १३३ फूट उंच प्रतिमेला विशाल पुष्पहार अर्पण करून वंदन केले. 

स्मारकावरील आपल्या वास्तव्यादरम्यान पंतप्रधानांनी ध्यान लावले तसेच सूर्योदयाच्या वेळी सूर्यास ‘अर्घ्य’ दिले. ‘सूर्य अर्घ्य’ ही आध्यात्मिक अभ्यासाशी संबंधित परंपरा असून, त्यात सूर्याला जल अर्पण करून नमन केले जाते. विवेकानंद शीला स्मारकावर ध्यान करताना मोदी यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेले कन्याकुमारी हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी प्रसिद्ध असून, विवेकानंद शीला स्मारक याच किनाऱ्याजवळील एका छोट्या खडकाळ बेटावर स्थित आहे.

या बेटावरील शीलेवर स्वामी विवेकानंद यांनी ध्यान धारणा केली होती. नंतर त्यांच्या स्मरणार्थ याच बेटावर त्यांचे स्मारक उभारण्यात आले. ते विवेकानंद शीला स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांनी ३० मेरोजी संध्याकाळी विवेकानंद शीला स्मारकावर ध्यान साधना सुरू केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी