शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

विद्यापीठात पिण्यास पाणी नसल्याने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली विद्यार्थ्यांपुढे दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:36 IST

विश्वभारतीचा दीक्षान्त समारंभ; बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही उपस्थित

कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या समस्येची दखल घेऊ न, आपल्या भाषणात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात करून पंतप्रधान म्हणाले की, मी येत असताना काही विद्यार्थ्यांनी पाण्याच्या समस्येविषयी हातवारे करून सांगितले. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, असे मोदी म्हणाले. दिलगिरी व्यक्त करताना त्यांचा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असावा, याची चर्चा सुरू होती.मोदी म्हणाले की, मी येथे पाहुणा म्हणून नव्हे, तर या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आलो आहे. विद्येसाठी आपण गुरूंकडे जायचे असते, अशी आपली संस्कृती सांगते. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे पावन झालेल्या या विद्यापीठात शिक्षकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या समारंभास राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी व मुख्यमंत्री ममत बॅनर्जी हेही उपस्थित होते. बांग्ला भवनचे उद्घाटनया समारंभाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एका विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला दोन पंतप्रधानांनी उपस्थित राहणे, पहिल्यांदाच घडले असेल. दोन्ही पंतप्रधानांनी बांग्ला भवनाचेही उद्घाटन केले.मोदींनी दाखवला ममतांना मार्गपंतप्रधान हेलिकॉप्टरने पोहोचले, तेव्हा राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. ममता बॅनर्जी घाईघाईने तिथे येत होत्या. पण त्या रस्त्यात चिखल होता. त्यामुळे या रस्त्याने या असे मोदी यांनी हाताने खुणा करून मुख्यमंत्र्यांना सांगितले.टागोर व महात्मा गांधी यांचा आवर्जून उल्लेखया भूमीला गुरूदेवांच्या पायाचा स्पर्श झाला आहे. कधी तरी त्यांनी येथेच महात्मा गांधी यांच्याशी चर्चाही केली आहे. त्या दोघा महापुरुषांमध्ये काय चर्चा झाली असेल, याचा विचार इथे येताना मी करीत होतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी