शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विद्यापीठात पिण्यास पाणी नसल्याने पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली विद्यार्थ्यांपुढे दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:36 IST

विश्वभारतीचा दीक्षान्त समारंभ; बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याही उपस्थित

कोलकाता : शांतिनिकेतनमध्ये विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या समस्येची दखल घेऊ न, आपल्या भाषणात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बंगाली भाषेत मोदींनी भाषणाची सुरुवात करून पंतप्रधान म्हणाले की, मी येत असताना काही विद्यार्थ्यांनी पाण्याच्या समस्येविषयी हातवारे करून सांगितले. याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, असे मोदी म्हणाले. दिलगिरी व्यक्त करताना त्यांचा टोला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असावा, याची चर्चा सुरू होती.मोदी म्हणाले की, मी येथे पाहुणा म्हणून नव्हे, तर या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून आलो आहे. विद्येसाठी आपण गुरूंकडे जायचे असते, अशी आपली संस्कृती सांगते. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे पावन झालेल्या या विद्यापीठात शिक्षकांच्या उपस्थितीत वेळ घालवण्याची संधी मला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या समारंभास राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी व मुख्यमंत्री ममत बॅनर्जी हेही उपस्थित होते. बांग्ला भवनचे उद्घाटनया समारंभाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होता. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एका विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला दोन पंतप्रधानांनी उपस्थित राहणे, पहिल्यांदाच घडले असेल. दोन्ही पंतप्रधानांनी बांग्ला भवनाचेही उद्घाटन केले.मोदींनी दाखवला ममतांना मार्गपंतप्रधान हेलिकॉप्टरने पोहोचले, तेव्हा राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. ममता बॅनर्जी घाईघाईने तिथे येत होत्या. पण त्या रस्त्यात चिखल होता. त्यामुळे या रस्त्याने या असे मोदी यांनी हाताने खुणा करून मुख्यमंत्र्यांना सांगितले.टागोर व महात्मा गांधी यांचा आवर्जून उल्लेखया भूमीला गुरूदेवांच्या पायाचा स्पर्श झाला आहे. कधी तरी त्यांनी येथेच महात्मा गांधी यांच्याशी चर्चाही केली आहे. त्या दोघा महापुरुषांमध्ये काय चर्चा झाली असेल, याचा विचार इथे येताना मी करीत होतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी