शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

By admin | Updated: March 15, 2017 20:30 IST

उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवीत जोरदार स्वागत केले. किडनीच्या आजारपणानंतर दीर्घकाळाने सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षिय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. उत्तरप्रदेश व उत्तराखंडाच्या जोडीला मणिपूर आणि गोव्यातही भाजपचेच सरकार स्थापन होत असल्याने सत्ताधारी बाकांवर प्रचंड उत्साह संचारला होता. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. तथापि सत्ताधारी सदस्यांमधे अचानक पंतप्रधानांच्या स्वागताचा जोश संचारल्यामुळे काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवतांना दिसले तर टीआरएसच्या जितेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाउन त्यांचे अभिनंदन केले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच साऱ्या सभागृहाने सुषमा स्वराजांचे हार्दिक स्वागत केले. स्वराजांचे स्वागत करतांना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. स्वागताचा स्वीकार करतांना सुषमा स्वराजांनी तमाम सदस्यांचे आभार मानले. भगवान कृष्णाची आपल्यावर कृपा असल्यामुळेच या आजारातून मी सुखरूप बाहेर आले असेही त्या म्हणाल्या.अमेरिकेत मूळचे भारतीय असलेल्या नागरीकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत केंद्र सरकार गप्प का बसले आहे? या आरोपाचे जोरदार खंडन करतांना सुषमा स्वराज म्हणाल्या, अमेरिकेत भारतीय मूळाच्या नागरिकांची सुरक्षितता हा केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अमेरिकेत ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांनीही सरकारवर असा आरोप केलेला नाही. भारत सरकार अमेरिकन सरकारशी सातत्याने संवाद साधून आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारत सरकारच्या दूतावासाशी देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे. परदेशस्थ भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार सतर्क असून आवश्यक ती सारी कार्यवाही सरकार करील, अशी ग्वाही स्वराज यांनी लोकसभेत दिली. गोवा आणि मणिपूरमधे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिले नाही. पक्षाची बाजूही ऐकली नाही. याचा निषेध करीत काँग्रेस सदस्य घोषणा देत वेलमधे आले. या गोंधळात राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाल्यानंतर अंतत: दिवसभरासाठी तहकूब झाले.