शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

By admin | Updated: March 15, 2017 20:30 IST

उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवीत जोरदार स्वागत केले. किडनीच्या आजारपणानंतर दीर्घकाळाने सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षिय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. उत्तरप्रदेश व उत्तराखंडाच्या जोडीला मणिपूर आणि गोव्यातही भाजपचेच सरकार स्थापन होत असल्याने सत्ताधारी बाकांवर प्रचंड उत्साह संचारला होता. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. तथापि सत्ताधारी सदस्यांमधे अचानक पंतप्रधानांच्या स्वागताचा जोश संचारल्यामुळे काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवतांना दिसले तर टीआरएसच्या जितेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाउन त्यांचे अभिनंदन केले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच साऱ्या सभागृहाने सुषमा स्वराजांचे हार्दिक स्वागत केले. स्वराजांचे स्वागत करतांना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. स्वागताचा स्वीकार करतांना सुषमा स्वराजांनी तमाम सदस्यांचे आभार मानले. भगवान कृष्णाची आपल्यावर कृपा असल्यामुळेच या आजारातून मी सुखरूप बाहेर आले असेही त्या म्हणाल्या.अमेरिकेत मूळचे भारतीय असलेल्या नागरीकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत केंद्र सरकार गप्प का बसले आहे? या आरोपाचे जोरदार खंडन करतांना सुषमा स्वराज म्हणाल्या, अमेरिकेत भारतीय मूळाच्या नागरिकांची सुरक्षितता हा केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अमेरिकेत ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांनीही सरकारवर असा आरोप केलेला नाही. भारत सरकार अमेरिकन सरकारशी सातत्याने संवाद साधून आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारत सरकारच्या दूतावासाशी देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे. परदेशस्थ भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार सतर्क असून आवश्यक ती सारी कार्यवाही सरकार करील, अशी ग्वाही स्वराज यांनी लोकसभेत दिली. गोवा आणि मणिपूरमधे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिले नाही. पक्षाची बाजूही ऐकली नाही. याचा निषेध करीत काँग्रेस सदस्य घोषणा देत वेलमधे आले. या गोंधळात राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाल्यानंतर अंतत: दिवसभरासाठी तहकूब झाले.