शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पंतप्रधान मोदी आणि सुषमा स्वराजांचे लोकसभेत हार्दिक स्वागत

By admin | Updated: March 15, 2017 20:30 IST

उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवीत जोरदार स्वागत केले. किडनीच्या आजारपणानंतर दीर्घकाळाने सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षिय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले. निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. उत्तरप्रदेश व उत्तराखंडाच्या जोडीला मणिपूर आणि गोव्यातही भाजपचेच सरकार स्थापन होत असल्याने सत्ताधारी बाकांवर प्रचंड उत्साह संचारला होता. पंतप्रधानांनी सभागृहात प्रवेश केला तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. तथापि सत्ताधारी सदस्यांमधे अचानक पंतप्रधानांच्या स्वागताचा जोश संचारल्यामुळे काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवतांना दिसले तर टीआरएसच्या जितेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाउन त्यांचे अभिनंदन केले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच साऱ्या सभागृहाने सुषमा स्वराजांचे हार्दिक स्वागत केले. स्वराजांचे स्वागत करतांना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. स्वागताचा स्वीकार करतांना सुषमा स्वराजांनी तमाम सदस्यांचे आभार मानले. भगवान कृष्णाची आपल्यावर कृपा असल्यामुळेच या आजारातून मी सुखरूप बाहेर आले असेही त्या म्हणाल्या.अमेरिकेत मूळचे भारतीय असलेल्या नागरीकांवर होत असलेल्या हल्ल्याबाबत केंद्र सरकार गप्प का बसले आहे? या आरोपाचे जोरदार खंडन करतांना सुषमा स्वराज म्हणाल्या, अमेरिकेत भारतीय मूळाच्या नागरिकांची सुरक्षितता हा केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अमेरिकेत ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबियांनीही सरकारवर असा आरोप केलेला नाही. भारत सरकार अमेरिकन सरकारशी सातत्याने संवाद साधून आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील भारतीय समुदाय आणि भारत सरकारच्या दूतावासाशी देखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय नियमितपणे संपर्कात आहे. परदेशस्थ भारतीयांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सरकार सतर्क असून आवश्यक ती सारी कार्यवाही सरकार करील, अशी ग्वाही स्वराज यांनी लोकसभेत दिली. गोवा आणि मणिपूरमधे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिले नाही. पक्षाची बाजूही ऐकली नाही. याचा निषेध करीत काँग्रेस सदस्य घोषणा देत वेलमधे आले. या गोंधळात राज्यसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाल्यानंतर अंतत: दिवसभरासाठी तहकूब झाले.