शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जमावांकडून होणारा हिंसाचार तत्परतेने रोखा; केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:53 IST

मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या समाजमाध्यमांतून पसरणा-या अफवांवरून जमावांकडून संशयितांना ठार मारले जाण्याच्या घटनांना वेळीच आवर घालण्यासाठी तत्परतेने व कठोर पावले उचलावीत, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांना दिले.

नवी दिल्ली : मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या समाजमाध्यमांतून पसरणा-या अफवांवरून जमावांकडून संशयितांना ठार मारले जाण्याच्या घटनांना वेळीच आवर घालण्यासाठी तत्परतेने व कठोर पावले उचलावीत, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांना दिले.अशा हिंसाचारात गेल्या काही महिन्यांत देशाच्या अनेक भागांत २० हून अधिक निरपराधांचे बळी गेल्यानंतर केंद्राने हे पाऊल उचलले आहे. दोनच दिवसांपूर्वी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी अशा प्रकारचे हिंसाचार रोखणे हे राज्यांचे कर्तव्य असल्याचे बजावले होते. तसेच केंद्राला एखादी योजना तयार करण्यास सुचविले होते.कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे व त्यात आम्ही सक्तीच्या स्वरूपात ढवळाढवळ करू शकत नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांनी काय करावे, याच्या सूचना पाठविल्या आहेत. अशा घटना होऊच नयेत यासाठी काय करावे व झाल्यास त्या तत्परतेने हाताळाव्यात, असे सांगण्यात आले आहे. याआधी सरकारने ‘व्हॉट््सअ‍ॅप’ला पत्र लिहून ‘बेजबाबदार व प्रक्षोभक’ संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यास सांगितले होते. त्यावर ‘व्हॉट््सअ‍ॅप’च्या प्रवक्त्याने म्हटले होते की, खोटी व आक्षेपार्ह माहिती पसरविली जाऊ नये यासाठी शक्य असलेले अटकाव आम्ही करत आहोत.अफवा रोखण्यासाठीमुले पळविण्याच्या अफवांचा उगम कुठून होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करून त्या पसरणार नाहीत यासाठी पावले उचलावीत.अशा अफवांनी प्रभावित होऊ शकतील, असे भाग शोधून समाज प्रबोधन व सामाजिक संदेशांतून त्यांचे निराकरण करावे.मुले पळविण्याच्या घटना घडल्या तर, लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांचा तपास तत्परतेने केला जावा.

टॅग्स :Governmentसरकार