शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:03 IST

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचे निमित्त साधून केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याच्या तयारीत असल्याची शंका ‘आम आदमी पार्टी’ सरकारचे मंत्री आणि नेते व्यक्त करीत आहेत.

केजरीवाल सरकारविरोधात मोठे कारस्थान रचले जात असून, येणाऱ्या काही दिवसांत केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थ तसेच शिक्षणमंत्री आतिशी सिंह यांनी केला. सरकारच्या कामकाजाविषयी कारण नसताना उपराज्यपाल सक्सेना गृह मंत्रालयाला पत्रे लिहीत आहेत. अधिकारी बैठकींना येत नाहीयेत.  या घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या निदर्शक असल्याचा दावा आतिशी सिंह यांनी केला.

पक्षप्रचारासाठी सिसोदिया यांना हवा जामीनnगेल्या चौदा महिन्यांपासून मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामिनासाठी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. nसिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने खटले भरले असून, याचिकेवर २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. 

राज्यसभा खासदार नेमके गेले कुठे? जोरदार चर्चापंजाब आणि दिल्ली मिळून आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० खासदार आहेत. त्यापैकी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले संजय सिंह वगळता राज्यसभेतील पक्षाचे अन्य खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर फारसे दिसलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, ‘आप’चे राज्यसभा सदस्य पूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे सांगून त्यांच्या संबंधात सुरू असलेल्या अटकळी सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावल्या.

....म्हणून त्यांची अस्वस्थता वाढलीकितीही जोर लावला तरीही दिल्लीत निवडणूक जिंकून सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. वीज, पाणी, शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत वाहतूक तसेच दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घोषणेमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. या सर्व योजना रोखण्यासाठी  सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप