शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:03 IST

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचे निमित्त साधून केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याच्या तयारीत असल्याची शंका ‘आम आदमी पार्टी’ सरकारचे मंत्री आणि नेते व्यक्त करीत आहेत.

केजरीवाल सरकारविरोधात मोठे कारस्थान रचले जात असून, येणाऱ्या काही दिवसांत केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थ तसेच शिक्षणमंत्री आतिशी सिंह यांनी केला. सरकारच्या कामकाजाविषयी कारण नसताना उपराज्यपाल सक्सेना गृह मंत्रालयाला पत्रे लिहीत आहेत. अधिकारी बैठकींना येत नाहीयेत.  या घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या निदर्शक असल्याचा दावा आतिशी सिंह यांनी केला.

पक्षप्रचारासाठी सिसोदिया यांना हवा जामीनnगेल्या चौदा महिन्यांपासून मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामिनासाठी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. nसिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने खटले भरले असून, याचिकेवर २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. 

राज्यसभा खासदार नेमके गेले कुठे? जोरदार चर्चापंजाब आणि दिल्ली मिळून आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० खासदार आहेत. त्यापैकी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले संजय सिंह वगळता राज्यसभेतील पक्षाचे अन्य खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर फारसे दिसलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, ‘आप’चे राज्यसभा सदस्य पूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे सांगून त्यांच्या संबंधात सुरू असलेल्या अटकळी सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावल्या.

....म्हणून त्यांची अस्वस्थता वाढलीकितीही जोर लावला तरीही दिल्लीत निवडणूक जिंकून सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. वीज, पाणी, शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत वाहतूक तसेच दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घोषणेमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. या सर्व योजना रोखण्यासाठी  सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप