शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत राष्ट्रपती राजवट?; केंद्र सरकारकडून तयारी सुरू असल्याचा आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:03 IST

गृहमंत्रालयाला विनाकारण उपराज्यपालांची पत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असल्याचे निमित्त साधून केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रपती राजवट लावण्याच्या तयारीत असल्याची शंका ‘आम आदमी पार्टी’ सरकारचे मंत्री आणि नेते व्यक्त करीत आहेत.

केजरीवाल सरकारविरोधात मोठे कारस्थान रचले जात असून, येणाऱ्या काही दिवसांत केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती असल्याचा आरोप दिल्लीच्या अर्थ तसेच शिक्षणमंत्री आतिशी सिंह यांनी केला. सरकारच्या कामकाजाविषयी कारण नसताना उपराज्यपाल सक्सेना गृह मंत्रालयाला पत्रे लिहीत आहेत. अधिकारी बैठकींना येत नाहीयेत.  या घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या निदर्शक असल्याचा दावा आतिशी सिंह यांनी केला.

पक्षप्रचारासाठी सिसोदिया यांना हवा जामीनnगेल्या चौदा महिन्यांपासून मद्य धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी अंतरिम जामिनासाठी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. nसिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने खटले भरले असून, याचिकेवर २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. 

राज्यसभा खासदार नेमके गेले कुठे? जोरदार चर्चापंजाब आणि दिल्ली मिळून आम आदमी पार्टीचे राज्यसभेत १० खासदार आहेत. त्यापैकी नुकतेच तिहार तुरुंगातून जामिनावर सुटलेले संजय सिंह वगळता राज्यसभेतील पक्षाचे अन्य खासदार केजरीवाल यांच्या अटकेनंतर फारसे दिसलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, ‘आप’चे राज्यसभा सदस्य पूर्वीही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते, असे सांगून त्यांच्या संबंधात सुरू असलेल्या अटकळी सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावल्या.

....म्हणून त्यांची अस्वस्थता वाढलीकितीही जोर लावला तरीही दिल्लीत निवडणूक जिंकून सत्तेत येऊ शकत नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. वीज, पाणी, शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना मोफत वाहतूक तसेच दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घोषणेमुळे भाजपची अस्वस्थता वाढली आहे. या सर्व योजना रोखण्यासाठी  सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. ‘आप’ने बहुमत सिद्ध केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप