शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एनआरसीप्रकरणी हस्तक्षेप करण्याची राष्ट्रपतींना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:07 IST

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.

नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, माकपचे मोहम्मद सलीम, जनता दल (सेक्यूलर)चे एच. डी. देवेगौडा, तेलुगू देसम पार्टीचे वाय. एस. चौधरी, आपचे संजय सिंग आदी नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्ये केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. एनआरसीमधून ४० लाख भारतीय नागरिकांची नावे त्यामुळेच वगळण्यात आली, असा आरोप या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला. त्यात पुढे म्हटले आहे की, एनआरसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्र सरकार दिशाभूल करणारी विधाने करीत आहे.>चंडी यांचा आरोपएनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ओमन चंडी यांनी केला. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एनआरसीबद्दल विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. एनआरसीमधून वगळण्यात आलेले जे लोक देश सोडून जाणार नाहीत त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणातील भाजपा आमदार टी. राजा सिंग यांनी ३१ जुलै रोजी केले होते. त्यांच्यावरही त्या पक्षाने अद्याप कारवाई केले नाही, असेही चंडी यांनी पुढे म्हटले आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRamnath Kovindरामनाथ कोविंद