शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एनआरसीप्रकरणी हस्तक्षेप करण्याची राष्ट्रपतींना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 04:07 IST

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.

नवी दिल्ली : आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) एकाही भारतीय नागरिकाचे नाव वगळण्यात येऊ नये यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डावे आदी पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना गुरुवारी केली.काँग्रेसचे नेते आनंद शर्मा, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, माकपचे मोहम्मद सलीम, जनता दल (सेक्यूलर)चे एच. डी. देवेगौडा, तेलुगू देसम पार्टीचे वाय. एस. चौधरी, आपचे संजय सिंग आदी नेत्यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्ये केंद्र सरकार पायदळी तुडवत आहे. एनआरसीमधून ४० लाख भारतीय नागरिकांची नावे त्यामुळेच वगळण्यात आली, असा आरोप या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात केला. त्यात पुढे म्हटले आहे की, एनआरसीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्र सरकार दिशाभूल करणारी विधाने करीत आहे.>चंडी यांचा आरोपएनआरसीच्या मुद्द्यावरून भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ओमन चंडी यांनी केला. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एनआरसीबद्दल विरोधकांनी नोंदविलेल्या आक्षेपांकडे भाजपा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. एनआरसीमधून वगळण्यात आलेले जे लोक देश सोडून जाणार नाहीत त्यांना गोळ्या घालून ठार मारा, असे आक्षेपार्ह वक्तव्य तेलंगणातील भाजपा आमदार टी. राजा सिंग यांनी ३१ जुलै रोजी केले होते. त्यांच्यावरही त्या पक्षाने अद्याप कारवाई केले नाही, असेही चंडी यांनी पुढे म्हटले आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीRamnath Kovindरामनाथ कोविंद