शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

राष्ट्रपतींनी टोचले गोंधळबाजांचे कान

By admin | Updated: January 20, 2015 02:41 IST

काँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीकाँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत काँग्रेसला हादरा दिला आहे.आर्थिक सुधारणांचा रेटा दाखवणाऱ्या विविध विधेयकांच्या संमतीसाठी गत आठ महिन्यांत आठ वटहुकूम काढणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी अप्रत्यक्षरीत्या ताकीद दिली़ प्रत्येक विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाचा पर्याय स्वीकारणे योग्य नसल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले़केंद्रीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले़ या वेळी वटहुकुमाच्या मुद्द्यावर केवळ सरकारच नाही, तर विरोधकांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या़ संसदेतील गोंधळ आणि वटहुुकुमाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राष्ट्रपती म्हणाले की, राज्यघटनेनुसार विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाच्या पर्यायाचावापर अत्यंत अपवादात्मक स्थितीत होणे अपेक्षित आहे़ सरसकट सर्वच विधेयकासाठी वटहुकूम आणणे योग्य नाही़कार्यपालिकेद्वारे सर्रास वटहुकूम जारी करण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय पक्षांशी बोललो आहे़ एकत्र येऊन सामंजस्याने तोडगा काढावा, असे मी त्यांना सुचवले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़अल्पसंख्यक असलेल्या गोंधळकऱ्यांकडून संयमी बहुसंख्यक घेरले जाऊ नये, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.संसदेत वारंवार अडथळे आणत कामकाज रोखण्याच्या वृत्तींवर राष्ट्रपतींनी केलेली टीका काँग्रेसला जास्त बोचणारी आहे. राष्ट्रपती एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तीन दशकांनंतर देशातील मतदारांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत स्थिर सरकारसाठी आणि जनतेच्या आशाआकांक्षाच्या पूर्ततेसाठी कौल दिला असल्याचे नमूद केले. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी कामकाजाचा खोळंबा चालविल्याबद्दल राष्ट्रपतींनी नापसंती दर्शविल्याचे स्पष्टच दिसून येते. पहिल्यांदाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जे घडले त्यावर राष्ट्रपती बोलले आहेत. राज्यसभेचे कामकाज ठप्प पडल्याची पार्श्वभूमी त्यामागे होती.शहांच्या धोरणाचा भाजपला लाभच्भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि अगदी जम्मू-काश्मीरमध्येही पक्षाची दारे खुली करीत अन्य पक्षांच्या असंतुष्ट नेत्यांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबले. च्भाजपने ही राज्ये काबीज करीत पक्षाला लाभच झाल्याचे दाखवून दिले. गेली १५ वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपला दिल्लीत सत्तेवर आणण्यासाठी शहा यांनी हेच धोरण कायम ठेवले आहे.व्यवहार्य तोडगा शोधणे ही सर्वांची जबाबदारी वटहुकूम आणण्याचा मार्ग टाळण्यासाठी एखादा व्यवहार्य तोडगा शोधणे ही संपूर्ण संसदीय सदस्यांची जबाबदारी आहे़ विरोधकांजवळ संख्याबळ असेल तर ते विरोध करू शकतात. पण अंतिमत: जबाबदारी ही लोकसभेत प्रत्यक्ष निवडून गेलेले व राज्यांतून राज्यसभेवर गेलेले सदस्य यांची असते. - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपतीराहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल नाराजीबीरेंदरसिंग यांनी ४० वर्षांनंतर काँग्रेसला रामराम ठोकण्याचे कारण राहुल गांधी यांची कार्यशैली हेच सांगण्यात येते. त्यातच कृष्णा तीरथ यांच्या राजीनाम्याने सोमवारी दुपारी काँग्रेसला अचानक हादरा बसला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांना केंद्रात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात येत असल्यानेच कुंपणावरील नेत्यांनी ही संधी शोधल्याचे मानले जाते.राष्ट्रपतींनी विरोधी पक्षांवर केलेल्या टीकेमुळे साहजिकच भाजपाच्या नेतृत्वाला आनंद झाला आहे. दिल्ली काँग्रेसमधील आघाडीच्या नेत्या दलित चेहरा मानल्या जाणाऱ्या कृष्णा तीरथ यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा आनंद द्विगुणित झाला.तीरथ यांचा भाजपाशी घरोबाच्तीरथ यांनी अचानक काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपाशी घरठाव करताना कुणावरही टीका करण्याचे टाळले, मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या काही निर्णयांवर त्या नाराज होत्या असे समजते. च्काँग्रेसने पक्षाची पडझड रोखण्यासाठी हालचाली चालविल्या असल्या तरी काँग्रेसचे आणखी काही नेते बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे.