शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या मुद्यांपासून दूर राहा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 20:26 IST

सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करत असल्याचं प्रतिपादन

नवी दिल्ली: देश सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. आपल्याला मूळ उद्दिष्टापासून भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं. ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करत होते. देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं. राष्ट्रपतींनी देशवासींयाना संबोधित करताना केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक केलं. 'देशातील परिस्थिती झपाट्यानं बदलत असून वेगानं विकास होत आहे. याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे,' असं कोविंद म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाचा विशेष उल्लेख केला. 'महात्मा गांधींना पूर्ण जगात सन्मान दिला जातो. संपूर्ण जग त्यांचा आदर करतं. त्यांचे आदर्श आपण समजून घ्यायला हवेत. गांधीजींनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली होती. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला प्राधान्य दिलं होतं,' अशा शब्दांमध्ये त्यांनी गांधीजींचं स्मरण केलं. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात महिलांचाही विशेष उल्लेख केला. 'आपल्या समाजात महिलांची विशेष भूमिका आहे. महिलांना व्यापक स्वातंत्र्य मिळाल्यास देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचं सार्थक होईल', असं राष्ट्रपती म्हणाले. 'कुटुंबातील मातांना, बहिणींना, मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. महिलांना त्यांच्या क्षमतांचा विकास आणि वापर करण्याची संधी द्यायला हवी. महिलांना सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळायला हव्यात,' असंही कोविंद यांनी म्हटलं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षIndependence Dayस्वातंत्र्य दिवसNarendra Modiनरेंद्र मोदी