शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपतींनी आपल्या मित्राची घेतली गळाभेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 11:09 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात.

भुवनेश्वर : उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मैत्रीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित गर्दीत असलेल्या आपल्या मित्राला पाहिले. त्यानंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवून मित्राला मंचावर बोलविले आणि गळाभेट घेतली. दरम्यान, 8 डिसेंबरला ओडिसामधील उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या जवळच्या मित्राशी त्यांची भेट झाली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकांच्या गर्दीतून आपल्या एका जुन्या मित्राला ओळखले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्याजवळ बसलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मित्राला मंचावर बोलविण्यास सांगितले. तसेच, मित्र मंचावर येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याची गळाभेट घेतली. हे पाहून उपस्थितांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे असे मित्र कोण आहेत, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ते ओडिसाचे माजी राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे बीरभद्र सिंह असे नाव असून ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. बीरभद्र सिंह हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 12 वर्षे जुने मित्र आहेत. बीरभद्र सिंह 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत काम केले होते. यावेळी बीरभद्र सिंह यांनी सांगितले की, जवळपास 12 वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदOdishaओदिशा