शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींचा अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवावा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 21:49 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना उद्देशून राष्ट्रपतींचं भाषण

नवी दिल्ली: कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित केलं. सध्या देशात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यात आंदोलनं सुरू आहेत. काही भागांत आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. महात्मा गांधींचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही सुसंगत आहेत. सत्य आणि अहिंसा या त्यांच्या तत्त्वांची आज जास्त आवश्यकता आहे. कोणत्याही उद्देशानं संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषत: तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा विचार सदैव लक्षात ठेवायला हवा. गांधींजींनी दिलेला हा विचार संपूर्ण मानवतेसाठी खूप मोठी देणगी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं. गेल्या काही दिवसांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. या विद्यापीठांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशातून सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं. 'लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका पार पाडताना देशाचा विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सोबत काम करायला हवं. विकासाच्या मार्गानं वाटचाल करताना आपला देश, देशाचे नागरिक, जगाला सहाय्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत. मानवतेच्या भविष्याच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,' असं राष्ट्रपतींनी म्हटलं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRepublic Dayप्रजासत्ताक दिनMahatma Gandhiमहात्मा गांधी