शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींचा अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवावा- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 21:49 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना उद्देशून राष्ट्रपतींचं भाषण

नवी दिल्ली: कोणत्याही कारणासाठी संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मंत्र लक्षात ठेवायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना संबोधित केलं. सध्या देशात अनेक ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यात आंदोलनं सुरू आहेत. काही भागांत आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. महात्मा गांधींचे विचार राष्ट्र निर्माणासाठी आजही सुसंगत आहेत. सत्य आणि अहिंसा या त्यांच्या तत्त्वांची आज जास्त आवश्यकता आहे. कोणत्याही उद्देशानं संघर्ष करणाऱ्यांनी, विशेषत: तरुणांनी गांधीजींचा अहिंसेचा विचार सदैव लक्षात ठेवायला हवा. गांधींजींनी दिलेला हा विचार संपूर्ण मानवतेसाठी खूप मोठी देणगी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं. गेल्या काही दिवसांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. या विद्यापीठांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशातून सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं. 'लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी त्यांची राजकीय भूमिका पार पाडताना देशाचा विकास आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सोबत काम करायला हवं. विकासाच्या मार्गानं वाटचाल करताना आपला देश, देशाचे नागरिक, जगाला सहाय्य करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत. मानवतेच्या भविष्याच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू,' असं राष्ट्रपतींनी म्हटलं.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRepublic Dayप्रजासत्ताक दिनMahatma Gandhiमहात्मा गांधी