शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

President Election: पवार, अब्दुल्लांचा नकार, आता कोण असेल विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही तीन नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 12:58 IST

President Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली - देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी  केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिल्याने विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २९ जून ही अखेरची तारीख असल्याने उमेदवार निवडीसाठी विरोधी पक्षांकडून नव्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे.

त्यामधून विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी तीन नावं चर्चेत आली आहेत. विरोधी पक्षांकडून गोपालकृष्ण गांधी, यशवंत सिन्हा आणि एन.के. प्रेमचंद्रन यांच्या नावांचा विचार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सुरू आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून विचार सुरू असलेले गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू आहेत. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल असलेल्या गोपालकृष्ण गांधी यांचं नाव बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. याआधी २०१९ मध्ये विरोधी पक्षांनी २०१७ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.

भाजपाचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचही नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत आहे. यशवंत सिन्हा हे भाजपाच्या बड्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कडवे विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. 

तर केरळमधील खासदार एन. के. प्रेमचंद्रन हे केरळ सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पुढे आणून दक्षिणेतील पक्षांचा पाठिंबा मिळवणे ही विरोधी पक्षांची रणनीती आहे. त्याचं कारण म्हणजे ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणामधील टीआरएसने अनुपस्थिती दर्शवली होती. यामधील एका जरी पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला तरी भाजपाचा उमेदवाराचा सहजपणे विजय होऊ शकतो.  

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षPoliticsराजकारण