शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांची बैठक संपली; एकच उमेदवार देण्याचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:23 IST

जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल अशी माहिती शरद पवारांनी दिली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ जुलैला होणार आहे. तत्पूर्वी विरोधकांनी या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन केले होते. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत विरोधकांकडून एक उमेदवार करण्याबाबत चर्चा झाली. शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणुकीत रस नसल्याचं सांगितले. या बैठकीला अनेक पक्ष पहिल्यांदाच हजर झाले होते अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. 

या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विरोधकांच्या या बैठकीला प्रत्येक पक्षाने आपापली मते मांडली. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार उभा करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. मोदी सरकारकडून लोकशाहीला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न होतोय तो रोखण्यासाठी एक मजबूत उमेदवार उभा केला जाईल असं सांगण्यात आले. 

 

तसेच जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल. त्यांना आजच्या बैठकीत जे काही ठराव झाले ते सांगण्यात येतील असंही पवारांनी सांगितले. तर या बैठकीला विरोधी पक्षातील प्रमुख नेते हजर होते. काही १-२ पक्षांनी गैरहजेरी लावली असली तरी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आले. या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उभं राहण्यासाठी आग्रह धरण्यात आला परंतु पवारांनी यासाठी नकार दिला. जर शरद पवार राजी झाले तर सगळेच त्यांना पाठिंबा देतील. मात्र नाही झाले तर अन्य उमेदवाराच्या नावाबाबत विचार केला जाईल. लवकरच हे नाव ठरवण्यात येईल असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.  

 

गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे. 

कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPresidentराष्ट्राध्यक्षMamata Banerjeeममता बॅनर्जी