शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांची बैठक संपली; एकच उमेदवार देण्याचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:23 IST

जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल अशी माहिती शरद पवारांनी दिली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ जुलैला होणार आहे. तत्पूर्वी विरोधकांनी या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन केले होते. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत विरोधकांकडून एक उमेदवार करण्याबाबत चर्चा झाली. शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणुकीत रस नसल्याचं सांगितले. या बैठकीला अनेक पक्ष पहिल्यांदाच हजर झाले होते अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. 

या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विरोधकांच्या या बैठकीला प्रत्येक पक्षाने आपापली मते मांडली. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार उभा करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. मोदी सरकारकडून लोकशाहीला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न होतोय तो रोखण्यासाठी एक मजबूत उमेदवार उभा केला जाईल असं सांगण्यात आले. 

 

तसेच जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल. त्यांना आजच्या बैठकीत जे काही ठराव झाले ते सांगण्यात येतील असंही पवारांनी सांगितले. तर या बैठकीला विरोधी पक्षातील प्रमुख नेते हजर होते. काही १-२ पक्षांनी गैरहजेरी लावली असली तरी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आले. या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उभं राहण्यासाठी आग्रह धरण्यात आला परंतु पवारांनी यासाठी नकार दिला. जर शरद पवार राजी झाले तर सगळेच त्यांना पाठिंबा देतील. मात्र नाही झाले तर अन्य उमेदवाराच्या नावाबाबत विचार केला जाईल. लवकरच हे नाव ठरवण्यात येईल असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.  

 

गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे. 

कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPresidentराष्ट्राध्यक्षMamata Banerjeeममता बॅनर्जी