शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:13 IST

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता.

हरयाणातील नूह येथे पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पलवलमध्ये झालेल्या हिंदू महापंचायतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात २८ ऑगस्टला पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे महापंचायतीत सांगण्यात आले. मात्र, या यात्रेची तारीख मागे किंवा पुढे होऊ शकते. दरम्यान, गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

सर्व हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषद विभागाचे मंत्री देवेंद्र सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, आज पलवलमध्ये हिंदू महापंचायत झाली. या हिंदू महापंचायतीला विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. पलवलचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेक अटींवर परवानगी देण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण प्रतिबंधित आहे. आमची टीम प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल आणि लोकांवर कोणतीही चुकीची कारवाई केली जाईल.

हिंदू महापंचायतीत केलेल्या मागण्याहिंसाचाराचा तपास एनआयएकडून करण्यात यावा. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. जखमींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्यात यावी. दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना भरपाई मिळावी. बेकायदेशीर घुसखोरांना राज्यातून हाकलून द्यावे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर पाठवले पाहिजे. नुह जिल्ह्यातील किंवा आसपासच्या गावातील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा. परिसरात निमलष्करी दल तैनात करावे, मेवातमध्ये मुख्यालय करावे, दंगली घडवणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांचे घर जप्त करावे, अशा मागण्या हिंदू महापंचायतीत करण्यात आल्या.

ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती- आचार्य आझाद शास्त्रीमहापंचायतीत हरयाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती असल्याचे म्हटले आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यास सांगितले. शास्त्री म्हणाले की, आपण मेवातमध्ये १०० शस्त्रांचा परवाना ताबडतोब घेतला पाहिजे. बंदुकांचा नव्हे तर रायफल्सचा. कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. ही 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. तसेच तरुणांनी एफआयआरला घाबरू नका असे सांगितले. एफआयआरला घाबरण्याची गरज नाही. माझ्यावरही एफआयआर आहेत, पण आपण घाबरू नये, असे शास्त्री यांनी सांगितले.

टॅग्स :Haryanaहरयाणा