शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:13 IST

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता.

हरयाणातील नूह येथे पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पलवलमध्ये झालेल्या हिंदू महापंचायतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात २८ ऑगस्टला पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे महापंचायतीत सांगण्यात आले. मात्र, या यात्रेची तारीख मागे किंवा पुढे होऊ शकते. दरम्यान, गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

सर्व हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषद विभागाचे मंत्री देवेंद्र सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, आज पलवलमध्ये हिंदू महापंचायत झाली. या हिंदू महापंचायतीला विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. पलवलचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेक अटींवर परवानगी देण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण प्रतिबंधित आहे. आमची टीम प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल आणि लोकांवर कोणतीही चुकीची कारवाई केली जाईल.

हिंदू महापंचायतीत केलेल्या मागण्याहिंसाचाराचा तपास एनआयएकडून करण्यात यावा. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. जखमींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्यात यावी. दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना भरपाई मिळावी. बेकायदेशीर घुसखोरांना राज्यातून हाकलून द्यावे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर पाठवले पाहिजे. नुह जिल्ह्यातील किंवा आसपासच्या गावातील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा. परिसरात निमलष्करी दल तैनात करावे, मेवातमध्ये मुख्यालय करावे, दंगली घडवणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांचे घर जप्त करावे, अशा मागण्या हिंदू महापंचायतीत करण्यात आल्या.

ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती- आचार्य आझाद शास्त्रीमहापंचायतीत हरयाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती असल्याचे म्हटले आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यास सांगितले. शास्त्री म्हणाले की, आपण मेवातमध्ये १०० शस्त्रांचा परवाना ताबडतोब घेतला पाहिजे. बंदुकांचा नव्हे तर रायफल्सचा. कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. ही 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. तसेच तरुणांनी एफआयआरला घाबरू नका असे सांगितले. एफआयआरला घाबरण्याची गरज नाही. माझ्यावरही एफआयआर आहेत, पण आपण घाबरू नये, असे शास्त्री यांनी सांगितले.

टॅग्स :Haryanaहरयाणा