शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:13 IST

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता.

हरयाणातील नूह येथे पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पलवलमध्ये झालेल्या हिंदू महापंचायतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात २८ ऑगस्टला पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे महापंचायतीत सांगण्यात आले. मात्र, या यात्रेची तारीख मागे किंवा पुढे होऊ शकते. दरम्यान, गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

सर्व हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषद विभागाचे मंत्री देवेंद्र सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, आज पलवलमध्ये हिंदू महापंचायत झाली. या हिंदू महापंचायतीला विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. पलवलचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेक अटींवर परवानगी देण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण प्रतिबंधित आहे. आमची टीम प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल आणि लोकांवर कोणतीही चुकीची कारवाई केली जाईल.

हिंदू महापंचायतीत केलेल्या मागण्याहिंसाचाराचा तपास एनआयएकडून करण्यात यावा. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. जखमींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्यात यावी. दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना भरपाई मिळावी. बेकायदेशीर घुसखोरांना राज्यातून हाकलून द्यावे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर पाठवले पाहिजे. नुह जिल्ह्यातील किंवा आसपासच्या गावातील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा. परिसरात निमलष्करी दल तैनात करावे, मेवातमध्ये मुख्यालय करावे, दंगली घडवणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांचे घर जप्त करावे, अशा मागण्या हिंदू महापंचायतीत करण्यात आल्या.

ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती- आचार्य आझाद शास्त्रीमहापंचायतीत हरयाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती असल्याचे म्हटले आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यास सांगितले. शास्त्री म्हणाले की, आपण मेवातमध्ये १०० शस्त्रांचा परवाना ताबडतोब घेतला पाहिजे. बंदुकांचा नव्हे तर रायफल्सचा. कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. ही 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. तसेच तरुणांनी एफआयआरला घाबरू नका असे सांगितले. एफआयआरला घाबरण्याची गरज नाही. माझ्यावरही एफआयआर आहेत, पण आपण घाबरू नये, असे शास्त्री यांनी सांगितले.

टॅग्स :Haryanaहरयाणा