शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका : मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशभरात हिंदुत्वाच्या मुद्दावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न गंभीर आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्याचे उदात्तीकरण असो किंवा सविधानाच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळणे असो हे त्यातलेच प्रकार आहेत. मुळात घटना बदलविण्याची मानसिकताच भाजपची आहे. त्यामुळे हे शब्द वगळणे ही तांत्रिक चूक वाटत नाही तर तसे जाणीवपूर्वक केले गेले असावे अशी शंका येते. एखादी गोष्ट करून त्याचे काय पडसाद उमटतात याची चाचणी घेण्याचाच ही खेळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका सष्ट करावी. हिंदुत्वाच्या अजेंड्याला समर्थन असेल तर तसे जाहीर करावे किंवा विरोध असेल तर तो स्पष्ट करावा, असे चव्हाण म्हणाले.
राज्यात पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले (प्रतिनिधी)
चौकट करावी
तर नटराजन यांच्यावर
कारवाई करावी
संविधानाला साक्षी ठेवून मंत्री शपथ घेत असल्याने त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे कायद्याच्या चौकटीतच असणे अपेक्षित असते. अशा वेळी कोणाच्या सांगण्यावरून जर मंत्री जयंती नटराजन यांनी निर्णय घेतले असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपावर दिली. राहुल गांधींवर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. राजकीय क्षेत्रात काम करताना एक नेता म्हणून त्यांच्याकडे आलेले पत्र संबंधितांकडे पाठवावे लागते. मात्र त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांना असतात, असे ते म्हणाले.