शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

काँग्रेस नेत्यांच्या टीकेमुळे प्रशांत किशोर नाराज

By admin | Updated: May 19, 2016 04:35 IST

निवडणूक व्यूहरचनेसाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर (पीके) हल्ली काँग्रेस नेत्यांच्या प्रखर टीकेमुळे कमालीचे अस्वस्थ असून,

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- निवडणूक व्यूहरचनेसाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर (पीके) हल्ली काँग्रेस नेत्यांच्या प्रखर टीकेमुळे कमालीचे अस्वस्थ असून, टीका करण्याची ही मालिका बंद झाली नाही, तर पीके उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी ते काँग्रेस सोडून जाण्याची दाट शक्यता आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पीकेंना उत्तर प्रदेश व पंजाबसाठी निवडणूक डावपेच तयार करण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, पीकेंनी आपल्या टीमला सोबत घेऊन कामाची सुरुवातही केली. राहुल व त्यांच्या टीमला अनेक सल्ले आणि सूचना केल्या. परंतु पीके व त्यांच्या टीमने या दोन्ही राज्यातील ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली, त्या-त्या ठिकाणी त्यांना काँग्रेस नेत्यांकडून उपेक्षा व टीकेलाच सामोरे जावे लागले. त्याची तक्रार राहुल गांधींकडे करण्यात आली असली, तरी स्थिती अद्याप जैसे थे आहे.सल्ला मान्य नाही; उलट टीकाचकाँग्रेसने पीकेंचा हा सल्ला मान्य तर केलाच नाही, उलट ‘पीकेंचे काम केवळ डावपेच आखणे आणि प्रचाराची योजना तयार करण्यापर्यंतच मर्यादित आहे. पक्ष संघटनेच्या कामाशी त्यांचा संबंध नाही,’ असे सरचिटणीस शकील अहमद यांना बोलायला सांगितले. पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग हेदेखील पीकेंचा कोणताही सल्ला मानायला तयार नाहीत. ।उत्तर प्रदेशात निवडणूक जिंकण्यासाठी एखादा ब्राह्मण चेहरा पुढे करण्याचा सल्ला पीकेंनी दिला होता. त्यासाठी त्यांनी शीला दीक्षित, जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांची नावेही सुचविली. सोबतच प्रियंका गांधी यांना अमेठी व रायबरेलीबाहेर काढण्यात यावे आणि त्यांनी संपूर्ण देशभरात निवडणूक प्रचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेसला दलित व्होट बँकेचा मोह त्यागावा लागेल. कारण दलित वर्ग मायावतींसोबत आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे दलितांना ओढण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मात्र, आपण दिलेला सल्ला व सूचनांकडे लक्ष दिले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. >‘निवडणुका कशा प्रकारे लढविल्या पाहिजे, हे काय आम्हाला पीकेकडून शिकावे लागणार काय,’ अशी टिप्पणी उत्तर प्रदेशच्या एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने केली आहे.पीकेंच्या कामामुळे काँग्रेस बळकट होईल. ते जे काही करीत आहेत, त्यामुळे किमान काँग्रेस पक्षात सक्रियता दिसत आहे. एरवी काँग्रेस नेते व कार्यकर्ते झोपलेलेच होते.- अनिल शास्त्री, माजी केंद्रीयमंत्री