शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Prashant Kishor: “राहुल गांधींनी गुजरात किंवा अन्य भाजपशासित राज्यातून भारत जोडो यात्रा सुरु करायला हवी होती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 22:20 IST

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Prashant Kishor: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रीय झाले आहेत. ३५०० किमी अंतर १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणाऱ्या या यात्रेची सांगता ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा आता कर्नाटकात पोहोचणार आहे. यातच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या यात्रेवर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना एक सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून नेतृत्व करण्याची ऑफर नाकारली होती. दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांनी कंबर कसली असून, आता विदर्भाला देशातील नवे राज्य करण्यासाठी प्रशांत किशोर सक्रीय झाले आहेत. यातच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट भाष्य केले आहे. 

भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती. काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. कारण येथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर हे या निवडणुकीत आपला अर्ज दाखल करू शकतात. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, असा ठराव एकमताने मंजूर केला आहे. 

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधी