शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

Prashant Kishor: “राहुल गांधींनी गुजरात किंवा अन्य भाजपशासित राज्यातून भारत जोडो यात्रा सुरु करायला हवी होती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 22:20 IST

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Prashant Kishor: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रीय झाले आहेत. ३५०० किमी अंतर १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणाऱ्या या यात्रेची सांगता ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा आता कर्नाटकात पोहोचणार आहे. यातच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या यात्रेवर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना एक सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून नेतृत्व करण्याची ऑफर नाकारली होती. दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांनी कंबर कसली असून, आता विदर्भाला देशातील नवे राज्य करण्यासाठी प्रशांत किशोर सक्रीय झाले आहेत. यातच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट भाष्य केले आहे. 

भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती. काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. कारण येथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर हे या निवडणुकीत आपला अर्ज दाखल करू शकतात. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, असा ठराव एकमताने मंजूर केला आहे. 

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधी