शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

"3 महिन्यांत १८ हजार लोकांना भेटणार, त्यानंतर पार्टीची घोषणा करणार", प्रशांत किशोरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:50 IST

Prashant Kishor : आज नव्या पक्षाची घोषणा करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली.

पाटणा :  गेल्या 30 वर्षांपासून बिहारमध्ये लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांचे सरकार होते, परंतु असे असतानाही बिहार आज इतर राज्यांच्या तुलनेत देशातील सर्वात मागास आणि गरीब राज्य आहे, असे म्हणत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आज नव्या पक्षाची घोषणा करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी गुरुवारी बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.   

आता बिहारमध्ये नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे. याठिकाणी सामाजिक न्यायाची बाब मागे पडली आहे. बिहार विकासाच्या बाबतीत सर्वात खालच्या स्तरावर आहे. हे सत्य कोण नाकारू शकत नाही. जर पुढील १०-१५ वर्षांत बिहारला आघाडीवर असलेल्या राज्यांच्या यादीत यायचे असेल तर नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 

कोणीही नवीन विचार आणि नवीन प्रयत्न करू शकत नाही, असे माझे मत आहे. जोपर्यंत बिहारचे सर्व लोक प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत बिहारचे कल्याण होऊ शकत नाही. मी आज कोणत्याही पक्षाची किंवा राजकीय पक्षाची घोषणा करणार नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत सार्वजनिक स्वावलंबनाचा विचार असलेल्या जवळपास १८ हजार लोकांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. 

याचबरोबर, जवळपास ९० टक्के लोक या मुद्द्यावर सहमत आहेत की नवीन विचार आणि नवीन प्रयत्नांची गरज आहे. मी आता १८ हजार लोकांशी चर्चा करणार आहे आणि या सर्वांना भागिदार बनवण्याचे माझे लक्ष्य आहे. हे सर्व एकत्र आले आणि या सर्वांनी नवीन पार्टी तयार करण्यासाठी सहमती दिली तर एका नवीन पार्टीची घोषणा केली जाईल, असेही प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण