शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:00 IST

Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

Prashant Kishor Jan Suraj : प्रशांत किशोर यांनी आज(2 ऑक्टोबर) आपल्या 'जन सूराज' पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या पीकेंनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. आज, पाटण्यात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्याराजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे. दरम्यान, पीकेंनी मनोज भारती यांना पक्षाचे कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.

    

माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पाटण्यात जन सुराजचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पीके म्हणाले की, जन सुराज मोहीम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पक्ष कधी काढणार, असा प्रश्न अनेकजण मला विचारत होते. आता आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे 'जन सूराज'ला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

पक्ष स्थापनेपूर्वी पदयात्रामहात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता आज अखेर त्यांनी पक्ष स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

कोण आहेत मनोज भारती?

प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांना जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतून (IFS) निवृत्त झालेल मनोज भारती दलित समाजातून येतात. जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष निवडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी 100 नावांची यादी मागवली होती. यातून मनोज यांच्या नावाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मार्चपर्यंत मनोज या पदावर राहणार आहेत.

पुढील वर्षी नवीन अध्यक्षाची निवडमनोज यांच्या निवडीची घोषणा करताना प्रशांत किशोर म्हणाले की, दलित समाजातील कोणीतरी अध्यक्ष होईल, असे आम्ही म्हटले होते. प्रत्येक समाजात एक कर्तबगार माणूस असतो, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकाला संधी दिली जाईल. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढील वर्षी मार्चपर्यंत केली जाईल.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण