शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:00 IST

Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

Prashant Kishor Jan Suraj : प्रशांत किशोर यांनी आज(2 ऑक्टोबर) आपल्या 'जन सूराज' पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या पीकेंनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. आज, पाटण्यात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्याराजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे. दरम्यान, पीकेंनी मनोज भारती यांना पक्षाचे कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.

    

माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पाटण्यात जन सुराजचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पीके म्हणाले की, जन सुराज मोहीम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पक्ष कधी काढणार, असा प्रश्न अनेकजण मला विचारत होते. आता आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे 'जन सूराज'ला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

पक्ष स्थापनेपूर्वी पदयात्रामहात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता आज अखेर त्यांनी पक्ष स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

कोण आहेत मनोज भारती?

प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांना जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतून (IFS) निवृत्त झालेल मनोज भारती दलित समाजातून येतात. जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष निवडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी 100 नावांची यादी मागवली होती. यातून मनोज यांच्या नावाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मार्चपर्यंत मनोज या पदावर राहणार आहेत.

पुढील वर्षी नवीन अध्यक्षाची निवडमनोज यांच्या निवडीची घोषणा करताना प्रशांत किशोर म्हणाले की, दलित समाजातील कोणीतरी अध्यक्ष होईल, असे आम्ही म्हटले होते. प्रत्येक समाजात एक कर्तबगार माणूस असतो, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकाला संधी दिली जाईल. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढील वर्षी मार्चपर्यंत केली जाईल.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण