शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:00 IST

Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.

Prashant Kishor Jan Suraj : प्रशांत किशोर यांनी आज(2 ऑक्टोबर) आपल्या 'जन सूराज' पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या पीकेंनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. आज, पाटण्यात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्याराजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे. दरम्यान, पीकेंनी मनोज भारती यांना पक्षाचे कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.

    

माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पाटण्यात जन सुराजचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पीके म्हणाले की, जन सुराज मोहीम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पक्ष कधी काढणार, असा प्रश्न अनेकजण मला विचारत होते. आता आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे 'जन सूराज'ला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

पक्ष स्थापनेपूर्वी पदयात्रामहात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता आज अखेर त्यांनी पक्ष स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.

कोण आहेत मनोज भारती?

प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांना जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतून (IFS) निवृत्त झालेल मनोज भारती दलित समाजातून येतात. जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष निवडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी 100 नावांची यादी मागवली होती. यातून मनोज यांच्या नावाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मार्चपर्यंत मनोज या पदावर राहणार आहेत.

पुढील वर्षी नवीन अध्यक्षाची निवडमनोज यांच्या निवडीची घोषणा करताना प्रशांत किशोर म्हणाले की, दलित समाजातील कोणीतरी अध्यक्ष होईल, असे आम्ही म्हटले होते. प्रत्येक समाजात एक कर्तबगार माणूस असतो, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकाला संधी दिली जाईल. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढील वर्षी मार्चपर्यंत केली जाईल.

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण