शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

‘तिरुपती’मधील प्रसादाच्या लाडूला आता नैसर्गिक गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 06:16 IST

स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता.

हैदराबाद :  तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांना लवकरच शून्य आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक शेती (सेंद्रिय) उत्पादन आणि कीटकनाशके, रासायनिक खते आणि  पालापाचोळा मुक्त कृषी उत्पादनापासून  तयार करण्यात आलेला   नैवेद्यम, लाडू प्रसादम आणि अन्न प्रसादम मिळणार आहे. तिरुमला मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना हे लाडू मिळतीलच. याशिवाय अण्णावरम, श्रीकलाहस्ती आणि श्रीसैलमसह अन्य १२ मंदिरातही मिळणार आहे.  आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून  कीटकनाशक मुक्त कृषी मालापासून तयार केलेले लाडू, प्रसाद या १२ मंदिरांनाही पुरविणार आहे.

स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता. राज्याने ६.२५ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे हा जगातील सर्वांत मोठा नैसर्गिक शेती कार्यक्रम बनला.

शेती ते मंदिर...: तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) यावर्षी २५ हजार शेतकऱ्यांकडे अशा १२ प्रकारच्या  २२ हजार टन  रसायनमुक्त कृषीमालाची मागणी नोंदविली आहे.  ५ हजार स्वयं-सहाय्यता गटाकडून तयार करण्यात आलेला हा कृषिमाल आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून  टीटीडीला पुरविणार आहे. शून्यावर आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक कृषी उत्पादन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम आपल्या गोशाळेतून पशुधन देणार आहे. आंध्र प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १,३५५ गायी दिल्या जाणार आहेत.

सामुदायिक प्रयत्न : रयथु साधिकारा संस्था ही कृषी उत्पादनांचा प्रचार आणि खरेदीसाठी गावातील संस्थांसोबत काम करत आहे. या माध्यमातून ८००० लोकांची फौज तयार करण्यात आली आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे शेतकरी पेरणीसाठी आरवायएसएसने सुचविलेल्या नऊ प्रकारच्या बियाण्यांचा वापर करतात, असे आरवायएसएसचे कार्यकारी उपाध्यक्ष टी. विजय कुमार यांनी सांगितले. सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. रमांजनेयुलू म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट