शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवणं त्यावेळीची सर्वोकृष्ट निवड- प्रणव मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:41 IST

राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे. मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांना त्यावेळी पंतप्रधान बनवण्याचा सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. मनमोहन यांना पंतप्रधान बनवणं ही सोनिया गांधींची सर्वोकृष्ट निवड होती, असंही ते म्हणाले. तिकिटातील घोळ व विखुरलेल्या महाआघाडीमुळे यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी 2012मध्ये अचानकपणे यूपीएशी घेतलेला काडीमोडी हेसुद्धा काँग्रेसचा पराभव होण्यातील प्रमुख कारण आहे.प्रणव मुखर्जी म्हणाले, 132 वर्षं जुना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत परतणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. पेट्रोल व डिझेलचे वाढलेले भाव, जीएसटी व दिवसेंदिवस डळमळीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरही मुखर्जी यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत. जीएसटीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु जीएसटी लागू करण्यामध्ये अडचणी तर येणारच आहेत. सोनिया गांधी या सुरुवातीला काहीशा मवाळ होत्या. मात्र वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला, असंही ते म्हणाले आहेत.मी बराच काळ राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. मी फक्त 2004मध्येही लोकसभेची जागा जिंकली होती. मला हिंदी भाषा माहीत नव्हती. त्यामुळे हिंदी येत नसलेल्या व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान बननं चुकीचं आहे. कामराज एकदा म्हणालेसुद्धा होते की, हिंदी येत नसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवता येणार नाही. यूपीए एकची महाआघाडी सुरळीत होती. त्या तुलनेत मात्र यूपीए दोनची महाआघाडी एवढी चांगली नव्हती. 2012मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत आघाडी टिकवण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच येत्या दिवसांत काँग्रेस पुन्हा एकदा देशात परतेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस