शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवणं त्यावेळीची सर्वोकृष्ट निवड- प्रणव मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:41 IST

राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे. मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांना त्यावेळी पंतप्रधान बनवण्याचा सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. मनमोहन यांना पंतप्रधान बनवणं ही सोनिया गांधींची सर्वोकृष्ट निवड होती, असंही ते म्हणाले. तिकिटातील घोळ व विखुरलेल्या महाआघाडीमुळे यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी 2012मध्ये अचानकपणे यूपीएशी घेतलेला काडीमोडी हेसुद्धा काँग्रेसचा पराभव होण्यातील प्रमुख कारण आहे.प्रणव मुखर्जी म्हणाले, 132 वर्षं जुना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत परतणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. पेट्रोल व डिझेलचे वाढलेले भाव, जीएसटी व दिवसेंदिवस डळमळीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरही मुखर्जी यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत. जीएसटीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु जीएसटी लागू करण्यामध्ये अडचणी तर येणारच आहेत. सोनिया गांधी या सुरुवातीला काहीशा मवाळ होत्या. मात्र वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला, असंही ते म्हणाले आहेत.मी बराच काळ राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. मी फक्त 2004मध्येही लोकसभेची जागा जिंकली होती. मला हिंदी भाषा माहीत नव्हती. त्यामुळे हिंदी येत नसलेल्या व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान बननं चुकीचं आहे. कामराज एकदा म्हणालेसुद्धा होते की, हिंदी येत नसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवता येणार नाही. यूपीए एकची महाआघाडी सुरळीत होती. त्या तुलनेत मात्र यूपीए दोनची महाआघाडी एवढी चांगली नव्हती. 2012मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत आघाडी टिकवण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच येत्या दिवसांत काँग्रेस पुन्हा एकदा देशात परतेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस