शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवणं त्यावेळीची सर्वोकृष्ट निवड- प्रणव मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 11:41 IST

राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी 2014च्या निवडणुकांसह जीएसटी, नोटाबंदीवर मत प्रदर्शन केलं आहे. मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांना त्यावेळी पंतप्रधान बनवण्याचा सोनिया गांधींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. मनमोहन यांना पंतप्रधान बनवणं ही सोनिया गांधींची सर्वोकृष्ट निवड होती, असंही ते म्हणाले. तिकिटातील घोळ व विखुरलेल्या महाआघाडीमुळे यूपीएला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी 2012मध्ये अचानकपणे यूपीएशी घेतलेला काडीमोडी हेसुद्धा काँग्रेसचा पराभव होण्यातील प्रमुख कारण आहे.प्रणव मुखर्जी म्हणाले, 132 वर्षं जुना काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत परतणार नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. पेट्रोल व डिझेलचे वाढलेले भाव, जीएसटी व दिवसेंदिवस डळमळीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावरही मुखर्जी यांनी दिलखुलास उत्तरे दिली आहेत. जीएसटीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु जीएसटी लागू करण्यामध्ये अडचणी तर येणारच आहेत. सोनिया गांधी या सुरुवातीला काहीशा मवाळ होत्या. मात्र वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला, असंही ते म्हणाले आहेत.मी बराच काळ राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. मी फक्त 2004मध्येही लोकसभेची जागा जिंकली होती. मला हिंदी भाषा माहीत नव्हती. त्यामुळे हिंदी येत नसलेल्या व्यक्तीनं भारताचा पंतप्रधान बननं चुकीचं आहे. कामराज एकदा म्हणालेसुद्धा होते की, हिंदी येत नसलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवता येणार नाही. यूपीए एकची महाआघाडी सुरळीत होती. त्या तुलनेत मात्र यूपीए दोनची महाआघाडी एवढी चांगली नव्हती. 2012मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत आघाडी टिकवण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच येत्या दिवसांत काँग्रेस पुन्हा एकदा देशात परतेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस