शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:17 IST

देशमुख, हजारिका व मुखर्जी हे अनुक्रमे ४६, ४७ व ४८ वे ‘भारतरत्न’ ठरले. ​​​​​​

नवी दिल्ली : थोर समाजसेवक नानाजी देशमुख व प्रख्यात संगीतकार आणि गीतकार भूपेन हजारिका या दोघांना मरणोत्तर, तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गुरुवारी सन्मानित करण्यात आले. देशमुख, हजारिका व मुखर्जी हे अनुक्रमे ४६, ४७ व ४८ वे ‘भारतरत्न’ ठरले.राष्ट्रपती भवनाच्या आलिशान अशोक दालनात झालेल्या छोटेखानी; पण दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांचे वितरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग व अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, लालकृष्ण अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.नानाजी देशमुख यांच्या वतीने त्यांनी स्थापन केलेल्या चित्रकूट येथील दीनदयाळ शोध संस्थानचे अध्यक्ष वीरेंद्रजित सिंग यांनी, तर हजारिका यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव तेज यांनी ‘भारतरत्न’चा स्वीकार केला. राष्ट्रपती कोविंद यांनी एक पायरी खाली उतरून आपले पूर्वसुरी असलेल्या प्रणवदांच्या गळ्यात ‘भारतत्न’चे पदक घालून सन्मानपत्र प्रदान केले. त्यानंतर दोघांमध्ये दीर्घ हस्तांदोलनही झाले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करून परस्परांच्या या आदरभावास दाद दिली. याआधी प्रणव मुखर्जी यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ प्रदान झाले तेव्हाही राष्ट्रपतीने माजी राष्ट्रपतींना सन्मानित करण्याचा सोहळा पाहायला मिळाला होता.सन्मानित होणारे चौथे माजी राष्ट्रपती‘प्रजासत्ताक होण्याआधीचे गव्हर्नर जनरलचे पद राष्ट्रपतीपदाच्या समकक्ष मानले तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी व डॉॅ. व्ही. व्ही. गिरी यांच्यानंतरचे ‘भारतरत्न’ने सन्मानित होणारे प्रवण मुखर्जी हे देशाचे चौथे माजी राष्ट्रपती ठरले.डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. झाकीर हुसैन व डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम या ‘भारतरत्न’च्या मानकऱ्यांनीही देशाचे राष्ट्रपतीपद भूषविले.प्रणव मुखर्जी सन २०१२ ते २०१७ या काळात राष्ट्रपती असताना २०१५ या एकाच वर्षी ‘भारतरत्न’ जाहीर झाले होते व त्यावेळी मुखर्जी यांच्या हस्ते पं. मदनमोहन मालवीय व अटल बिहारी वाजपेयी यांचा गौरव करण्यात आला होता.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRamnath Kovindरामनाथ कोविंद