शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दिग्विजय सिंह यांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी- पीयूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 15:09 IST

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जेवढे भ्रष्टाचारी आहेत, ते सर्वच तुरुंगात जातील. प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमेदवारीवर पीयूष गोयल म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी ज्या प्रकारे हिंदू समाजाला अपमानित केलं, त्याचा आम्ही पर्दाफाश केला आहे. त्यासाठीच आम्ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. आज दिग्विजय सिंह पंडित बोलावून पूजा करत आहेत. त्यांनीच कधी तरी हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला होता.काँग्रेस आधी सर्जिकल स्ट्राइक केलं हे मानण्यास तयार नव्हतं. आता ते सांगत आहेत की, आम्हीसुद्धा सर्जिकल स्ट्राइक केलं. खरं तर काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं मान्य केलं हे एका अर्थी बरं झालं. आम्ही राष्ट्रीय हितांच्या मुद्द्यावर सरकारला साथ दिली. काँग्रेसनं गेल्या 70 वर्षांत काहीही केलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 कोटी शौचालयं तयार केली. प्रत्येकानं जनधन खातं उघडलं. घरात वीज पोहोचली, उज्ज्वला योजनेचा लाभ लोकांना मिळाला. ममतादीदींनी जय श्री राम म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवलं.ममतांचं ध्रुवीकरणाचं राजकारण फार काळ चालणार नाही. आज देशभरात मोदींची त्सुनामी पाहायला मिळते आहे. शेतकरी, महिला आणि प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे. प. बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळेल. भाजपाच्या बाजूनं जनमत आहे. राजकीय हिंसेनं निवडणूक जिंकता येत नाहीत, असंही गोयल म्हणाले आहेत. 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ