शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधींच्या हत्येवेळी जखमी झालेले प्रदीप व्ही. फिलीपांची 'ती' इच्छा कोर्टानं केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 05:47 IST

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला

ठळक मुद्देसेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केलातपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितलेप्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले

डॉ. खुशालचंद बाहेतीचेन्नई : राजीव गांधी हत्येच्या वेळी जखमी झालेल्या अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली टोपी व गणवेशावरील नावाची पट्टी निवृत्तीच्या दिवशी परिधान करण्याची इच्छा न्यायालयाने पूर्ण केली. प्रदीप व्ही. फिलीप हे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबुदूर येथील सभेच्या बंदोबस्तात होते. त्यावेळी ते अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. मानवी बाॅम्ब फुटला तेव्हा ते राजीव गांधीच्या जवळच होते, पण यातून ते आश्चर्यकारक रीत्या बचावले. त्यांची टोपी, नावाची पाटी व गणवेशाचा सरंजाम फेकला गेला व ते स्वत: गंभीर जखमी झाले.

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला. सेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केला. या वस्तूंशी त्यांच्या भावना जुळलेल्या असून ते हे सर्व निवृत्तीच्या दिवशी परिधान करू इच्छितात, असे न्यायालयास सांगितले. तपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्यांच्या भावनांची दखल घेतली आणि त्यांचा गौरवपुर्वक उल्लेख करत विनंती मान्य केली.  निवृत्तीनंतर न्यायालयाचा मुद्देमाल परत करण्याच्या अटीवर टोपी, नाम पट्टी व सरंजाम तात्पुरता प्रदीप व्ही. फिलीप यांना दिला.प्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांना २००३ मध्ये राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण व २०१२ मध्ये विशेष सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या टोपी व सरंजामात अधिकाऱ्यांच्या ३४ वर्षे सेवेत घेतलेल्या परिश्रमाच्या भावना दडलेल्या आहेत. त्यांनी सेवेत गाळलेला घाम व रक्ताचे ते प्रतीक आहे. न्यायालय त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून बजावलेल्या गौरवपूर्ण आणि निर्दोष सेवेला सलाम करते. निवृत्तीनंतर त्यांना शांततेचे दिर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, या शुभेच्छा. - टी. चंद्रशेखरन, प्रथम सत्र न्यायाधीश, चेन्नई

टॅग्स :Courtन्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी