शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राजीव गांधींच्या हत्येवेळी जखमी झालेले प्रदीप व्ही. फिलीपांची 'ती' इच्छा कोर्टानं केली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 05:47 IST

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला

ठळक मुद्देसेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केलातपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितलेप्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले

डॉ. खुशालचंद बाहेतीचेन्नई : राजीव गांधी हत्येच्या वेळी जखमी झालेल्या अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली टोपी व गणवेशावरील नावाची पट्टी निवृत्तीच्या दिवशी परिधान करण्याची इच्छा न्यायालयाने पूर्ण केली. प्रदीप व्ही. फिलीप हे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबुदूर येथील सभेच्या बंदोबस्तात होते. त्यावेळी ते अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. मानवी बाॅम्ब फुटला तेव्हा ते राजीव गांधीच्या जवळच होते, पण यातून ते आश्चर्यकारक रीत्या बचावले. त्यांची टोपी, नावाची पाटी व गणवेशाचा सरंजाम फेकला गेला व ते स्वत: गंभीर जखमी झाले.

तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला. सेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केला. या वस्तूंशी त्यांच्या भावना जुळलेल्या असून ते हे सर्व निवृत्तीच्या दिवशी परिधान करू इच्छितात, असे न्यायालयास सांगितले. तपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्यांच्या भावनांची दखल घेतली आणि त्यांचा गौरवपुर्वक उल्लेख करत विनंती मान्य केली.  निवृत्तीनंतर न्यायालयाचा मुद्देमाल परत करण्याच्या अटीवर टोपी, नाम पट्टी व सरंजाम तात्पुरता प्रदीप व्ही. फिलीप यांना दिला.प्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांना २००३ मध्ये राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण व २०१२ मध्ये विशेष सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या टोपी व सरंजामात अधिकाऱ्यांच्या ३४ वर्षे सेवेत घेतलेल्या परिश्रमाच्या भावना दडलेल्या आहेत. त्यांनी सेवेत गाळलेला घाम व रक्ताचे ते प्रतीक आहे. न्यायालय त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून बजावलेल्या गौरवपूर्ण आणि निर्दोष सेवेला सलाम करते. निवृत्तीनंतर त्यांना शांततेचे दिर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, या शुभेच्छा. - टी. चंद्रशेखरन, प्रथम सत्र न्यायाधीश, चेन्नई

टॅग्स :Courtन्यायालयRajiv Gandhiराजीव गांधी