शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

दहशतीच्या सत्तेचे अस्तित्व अल्पकाळच - पंतप्रधान नरेंद्र मोदी; सोमनाथमधील प्रकल्पांचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 06:23 IST

Narendra Modi : गुजरातमधील सोमनाथ येथे पार्वती मंदिराचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. तसेच तेथील काही प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.

नवी दिल्ली : दहशतीच्या बळावर लोकांवर काही काळ सत्ता गाजविणाऱ्या विघातक शक्तींचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकणारे नसते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काढले.  अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा केला असून, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले असावे, अशी चर्चा आहे.

गुजरातमधील सोमनाथ येथे पार्वती मंदिराचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. तसेच तेथील काही प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले. हा समारंभ व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. त्या वेळी मोदी म्हणाले की, देशातील धार्मिक पर्यटन वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. गेल्या कित्येक शतकांत सोमनाथ मंदिर अनेकदा उद्ध्वस्त करण्यात आले. त्यातील मूर्ती फोडण्यात आल्या. या मंदिराचे अस्तित्व जितक्या वेळा नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तितक्या वेळा हे मंदिर पुन्हा उभारले गेले.

मोदी म्हणाले की, देशातील सर्वांत मोठ्या ४० तीर्थक्षेत्रांचा केंद्र सरकार विकास करत असून, त्यातील १५ ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. गुजरातमध्येही प्रसाद योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र विकासाच्या तीन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. हे सारे प्रकल्प भविष्यकाळात देशासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा विषय हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठामपणे सांगितले. 

१५ संकल्पनांवर आधारित पर्यटन योजनापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वदेशाचे उत्तम दर्शन सर्वांना घडावे यासाठी १५ विविध संकल्पनांच्या आधारे केंद्रीय पर्यटन खाते काही योजना अमलात आणत आहे. त्यामुळे पर्यटन व रोजगाराच्या संधी वाढून देशाच्या विकासाला हातभार लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी