शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:49 IST

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे.

नवी दिल्ली - देशात महागाई वाढत असताना आता विजेचा 'शॉक' बसू शकतो. गरमीमुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील वीज केंद्रांजवळील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे.

एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. अशाप्रकारे, 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा आयात केला जाईल, जो जागतिक बाजाराच्या दरानुसार केला जाणार आहे.

80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल 

कोळसा आयात करणार म्हणजे वीजनिर्मिती आता महाग होणार आहे. साहजिकच वीज निर्मिती कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करतील आणि त्यांच्या बिलाचं ओझ वाढेल. येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या प्रकरणाशी निगडित दोन सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल. म्हणजे बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याच्या खर्चामुळेही कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. मान्सूनबरोबर तो कमी झाला असला तरी 20 जुलै रोजी कमाल वापर 185.65 GW होता. सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते. मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागतो.

15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र आयातीतून त्याची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल, कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :electricityवीज