शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:49 IST

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे.

नवी दिल्ली - देशात महागाई वाढत असताना आता विजेचा 'शॉक' बसू शकतो. गरमीमुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील वीज केंद्रांजवळील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे.

एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. अशाप्रकारे, 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा आयात केला जाईल, जो जागतिक बाजाराच्या दरानुसार केला जाणार आहे.

80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल 

कोळसा आयात करणार म्हणजे वीजनिर्मिती आता महाग होणार आहे. साहजिकच वीज निर्मिती कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करतील आणि त्यांच्या बिलाचं ओझ वाढेल. येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या प्रकरणाशी निगडित दोन सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल. म्हणजे बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याच्या खर्चामुळेही कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. मान्सूनबरोबर तो कमी झाला असला तरी 20 जुलै रोजी कमाल वापर 185.65 GW होता. सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते. मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागतो.

15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र आयातीतून त्याची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल, कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :electricityवीज