शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:49 IST

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे.

नवी दिल्ली - देशात महागाई वाढत असताना आता विजेचा 'शॉक' बसू शकतो. गरमीमुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील वीज केंद्रांजवळील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे.

एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. अशाप्रकारे, 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा आयात केला जाईल, जो जागतिक बाजाराच्या दरानुसार केला जाणार आहे.

80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल 

कोळसा आयात करणार म्हणजे वीजनिर्मिती आता महाग होणार आहे. साहजिकच वीज निर्मिती कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करतील आणि त्यांच्या बिलाचं ओझ वाढेल. येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या प्रकरणाशी निगडित दोन सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल. म्हणजे बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याच्या खर्चामुळेही कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. मान्सूनबरोबर तो कमी झाला असला तरी 20 जुलै रोजी कमाल वापर 185.65 GW होता. सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते. मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागतो.

15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र आयातीतून त्याची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल, कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :electricityवीज