शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:49 IST

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे.

नवी दिल्ली - देशात महागाई वाढत असताना आता विजेचा 'शॉक' बसू शकतो. गरमीमुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील वीज केंद्रांजवळील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे.

एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. अशाप्रकारे, 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा आयात केला जाईल, जो जागतिक बाजाराच्या दरानुसार केला जाणार आहे.

80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल 

कोळसा आयात करणार म्हणजे वीजनिर्मिती आता महाग होणार आहे. साहजिकच वीज निर्मिती कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करतील आणि त्यांच्या बिलाचं ओझ वाढेल. येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या प्रकरणाशी निगडित दोन सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल. म्हणजे बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याच्या खर्चामुळेही कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. मान्सूनबरोबर तो कमी झाला असला तरी 20 जुलै रोजी कमाल वापर 185.65 GW होता. सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते. मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागतो.

15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र आयातीतून त्याची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल, कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :electricityवीज