शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मंत्रिपदे ‘अध्यक्षपदामुळे’ लांबणीवर

By admin | Updated: September 6, 2014 02:18 IST

चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
‘दुधाची तहान ताकावर.’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय मोदी सरकारच्या संभाव्य विस्तारात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता असलेल्या चंद्रपूरचे हंसराज अहिर, अहमदनगरचे दिलीप गांधी व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ या तीन ज्येष्ठ व अनुभवी खासदारांना आता आला आहे. त्यांना मंत्रिपद मिळेलही पण आज तरी त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.
मोदी सरकारात राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता असताना या तिघांनाही स्थायी  समितींचे अध्यक्षपद देऊन प्रथम पक्ष व नंतर मोदींनी धक्का दिला आहे. त्याचवेळी राज्य व गोव्यातील समस्त खासदारांच्या पुढय़ात साक्षात  महागाईच्या मुद्यावरून पंतप्रधानांनी ज्या खासदाराची शाळा घेतल्याची चर्चा भाजपात आहे, त्या किरीट सोमय्या यांचेही हाऊसिंग समितीचे अध्यक्षपद कायम ठेवल्याने पक्षातच आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या वर्तणुकीबाबत पक्षाच्याच काही खासदारांनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली होती.
सरकार स्थापनेनंतर ज्या समित्यांची प्रतीक्षा सुरू होती, त्यांचा पेटारा आठवडय़ारंभी फुटला,आणि महाराष्ट्राच्या ज्येष्ठ खासदारांच्या स्वप्नावर तुर्तास तरी विरजण पडल्याची भावना निर्माण झाली. लोकसभेच्या 21 स्थायी विषय समित्या व त्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये राज्याच्या वाटय़ाला चार समित्या आल्या असून, चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर (कोळसा व पोलाद), अहमदनगरचे दिलीप गांधी(सबऑर्डिनेट लेङिासलेशन), मुंबईचे किरीट सोमय्या (हाऊसिंग) व अमरावतीचे शिवसेना खा. आनंद अडसूळ ( रसायने व खते ) यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. 
राजधानीत असे सांगितले, की प्रश्नांची उत्तम जाण, अभायस व चिकाटी असे गुण जमेला असल्याने संघ व पक्षाच्या होकारानंतर मोदी मंत्रिमंडऴाच्या पहिल्या यादीत हंसराज अहीर यांचे नाव होते. पण ते वेळेवर मागे पडले. 
शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपदासोतच दोन राज्यमंत्रीपद असावे, असे वाटत असताना व त्यासाठी अमरावतीचे खासदार व माजी अर्थराज्यमंत्री आनंद अडसूळ यांनी स्वत:ला प्रोजेक्ट केल्याने पक्षाने त्यांचे पंख छाटून त्यांना स्यायी समितीवर पाठविले. त्यांची रसायने व खते या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. या पाश्र्वभूमीवर मंत्रिमडळाचा विस्तार केव्हा, हा प्रश्न विचारला जात असला तरी कोणाची वर्णी लागेल याबाबत संदिग्धता आहे.