शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

कारागृह महासंचालक पद केंद्र सरकारकडून रद्द; ‘सुधारसेवा’चे प्रमुख एडीजीच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:48 IST

आयपीएस अधिकाऱ्यांचा हिरमोड

- जमीर काझी मुंबई : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा  फटका गृह विभाग आणि अप्रत्यक्षपणे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना बसला आहे. कारागृहाचे प्रमुख असलेल्या महासंचालक सुधार सेवा (करेक्शन सर्व्हिस) हे पद  केंद्रीय गृह  विभागाने अमान्य केले आहे. त्यामुळे यापुढे तुरुंग प्रशासनाची सर्व जबाबदारी पूर्वीप्रमाणे अप्पर  महासंचालकांकडे असणार आहे. या पदावर सध्या सुरेंद्र एन. पांडये हे कार्यरत असून या  महिनाअखेरीस ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर  तेथील डीजीचे पद रद्द केले जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा केंद्र सरकारबरोबर अभिनेता सुशांतसिह  राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास, वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत व  पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई, आदींबाबत संघर्ष होत आहे. त्यातच आता महासंचालक (कारागृह) पदाची मान्यता रद्द करण्याची भर पडली आहे. महासंचालक दर्जाचे एक पद कमी झाल्याने पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. राज्यातील कारागृहांत घडलेल्या विविध घटनांमुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली होती. त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण असावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१७ मध्ये कारागृह विभागाच्या प्रमुखपदी  महासंचालक दर्जाचे पद निर्माण करून त्या ठिकाणी बिपीन बिहारी यांची पदोन्नतीवर नियुक्ती केली होती. त्यांच्यानंतर पांडये यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र केंद्रीय गृह विभागाने आता या पदाची मान्यता रद्द केल्याचे राज्य सरकारला कळविले  आहे. पांडये यांच्या निवृत्तीला काही कालावधी उरला असल्याने त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रलंबित ठेवली आहे.