शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

15 ऑगस्टला वाघा बॉर्डरवरील परेडवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

By admin | Updated: August 12, 2016 12:56 IST

पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 12 - स्वातंत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी तालिबान आखत आहे. पाकिस्तानने भारताला हल्ला होण्याची शक्यता असून वाघा बॉर्डरवरील परेडवर सहाय्याने दहशतवादी हल्ला करु शकतात अशी माहिती दिली आहे. दहशतवादी फक्त भारतावरच नाही तर पाकिस्तानवरही हल्ला करण्याची योजना आखत आहेत. दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या परेडमध्ये दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. 
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान हल्ला होण्याची भीती आहे. पाकिस्तानने यासंबंधी पंजाब गृह सचिवालयाला यासंबंधी पत्र लिहिलं आहे. तहरिक-ए-तालिबान आणि फजल उल्लाह या दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत आहेत. लाहोरमधील वाघा बॉर्डर किंवा गनदा सिंह बॉर्डवरील परेडवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच दोन आत्मघाती हल्लेखोरांवर या हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचंही पत्रात सांगण्यात आलं आहे. 
 
पाकिस्तानने दिलेल्या अलर्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचं आवाहन भारताला करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पंतप्रधान नवाझ शरिफ यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
 
पाकिस्तानने  बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लाच्या पार्श्वभुमीवर अगोदरच महत्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. या हल्ल्यात 70 लोकांचा मृत्यू झाला होता.