रखवालदार , शिपाई बदल्यांची शक्यता मावळली
By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST
पुणे : शिक्षण मंडळातील शिपाई आणि रखवालदारांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता शुक्रवारी पुर्णत: मावळली. पुढील दोन दिवस महापालिकेस सुटटी असल्याने तसेच येत्या सोमवारी ( दि. 15) पासून शाळा सुरू होत असल्याने या कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. दरम्यान, अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही बदल्या मागे घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले , तरी या बदल्या रद्द करण्याची यादी पुढील आठवडयातच अंतिम होणार असल्याने या सर्वच्या सर्व कर्मचा-यापुढे नवीन ठिकाणी हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
रखवालदार , शिपाई बदल्यांची शक्यता मावळली
पुणे : शिक्षण मंडळातील शिपाई आणि रखवालदारांच्या बदल्या रद्द होण्याची शक्यता शुक्रवारी पुर्णत: मावळली. पुढील दोन दिवस महापालिकेस सुटटी असल्याने तसेच येत्या सोमवारी ( दि. 15) पासून शाळा सुरू होत असल्याने या कर्मचा-यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. दरम्यान, अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही बदल्या मागे घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले , तरी या बदल्या रद्द करण्याची यादी पुढील आठवडयातच अंतिम होणार असल्याने या सर्वच्या सर्व कर्मचा-यापुढे नवीन ठिकाणी हजर राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक वर्षांपासून शिक्षण मंडळाच्या विविध शाळांमध्ये काम करणा?्या शिक्षक आणि रखवालदारांच्या बदल्याच केल्या गेल्या नव्हत्या. गेल्या सोमवारी शाळांचे प्रशासकीय कामकाज सुरू होताच, सुमारे तेराशे कर्मचा-यांच्या हातात बदल्यांचे आदेश पडले. तेव्हापासून, त्याविरोधात असंतोष पसरला असून, या बदल्या रद्द करण्यासाठी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले जात आहे.तर महापालिकेच्या नगरसेवकांनी तसेच पदाधिका-यांनीही या बदल्यांना अक्षेप घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत या बदल्यांचा गोंधळ सुरूच आहे. दरम्यान, गुरूवारीही स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत नगरसेवकांनी प्रशासनास बदल्या रद्द करण्याची मागणी केली मात्र, प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ===============रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई दरम्यान, जे बदली झालेले सुरक्षा रक्षक रखवालदार सोमवारी नवीन ठिकाणी हजर होणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्या सूचनाही प्रशासनाकडून संघटनांना देण्यात आला आहे. बदल्यांवर निर्णय होई पर्यंत नवीन ठिकाणी या कर्मचा-यांनी रुजू व्हावे त्यानंतर निर्णय बदलल्यास त्या प्रमाणे अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.====================