शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

खरीप पिकाचे भाव वाढण्याची शक्यता

By admin | Updated: June 9, 2017 03:51 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे. त्यात खरीप पिकांच्या किंमतीत वाढ करणे, हा मार्ग असू शकतो. खरिपाच्या १४ पिकांशी संबंधित केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. खरीप पिकांच्या खरेदी किमतीत मोठी वाढ करण्याची सरकारची इच्छा आहे, असे दिसते. ही घोषणा पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली पॅरीसहून परतल्यावर केली जाऊ शकते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारताच्या इतर भागांत येत्या काही दिवसांत मान्सूनचा पाऊस आला की तेथील आंदोलन शांत होईल, अशीही सरकारला अपेक्षा आहे.मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन संवेदनशीलतेने हाताळण्यास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सांगण्यात आले आहे. मोदी यांनी परदेशी रवाना होण्यापूर्वी चौहान यांना फोन केला आणि गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये भरपाई जाहीर करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन शांत व्हावे, ते अन्यत्र पसरू नये, यासाठी मध्य प्रदेश सरकार डाळी आणि कांदा पिके पुष्कळ जास्त भावाने विकत घेण्यासाठी नवी केंद्रे राज्यभर सुरू करण्याचे ठरविले आहे..शेतकऱ्यांचे आंदोलन इतर राज्यांत (विशेषत: शेजारच्या राजस्थान व गुजरातमध्ये) पसरणार नाही यावर मोदी यांचा अस्तानाला रवाना होण्यापूर्वी भर होता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात पीककर्ज माफीची घोषणा आधीच झालेली असून त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे. मोदी यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राज्यांतील परिस्थितीकडे बघण्यास सांगण्यात आले आहे.