शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

खरीप पिकाचे भाव वाढण्याची शक्यता

By admin | Updated: June 9, 2017 03:51 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे. त्यात खरीप पिकांच्या किंमतीत वाढ करणे, हा मार्ग असू शकतो. खरिपाच्या १४ पिकांशी संबंधित केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. खरीप पिकांच्या खरेदी किमतीत मोठी वाढ करण्याची सरकारची इच्छा आहे, असे दिसते. ही घोषणा पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली पॅरीसहून परतल्यावर केली जाऊ शकते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारताच्या इतर भागांत येत्या काही दिवसांत मान्सूनचा पाऊस आला की तेथील आंदोलन शांत होईल, अशीही सरकारला अपेक्षा आहे.मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन संवेदनशीलतेने हाताळण्यास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सांगण्यात आले आहे. मोदी यांनी परदेशी रवाना होण्यापूर्वी चौहान यांना फोन केला आणि गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये भरपाई जाहीर करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन शांत व्हावे, ते अन्यत्र पसरू नये, यासाठी मध्य प्रदेश सरकार डाळी आणि कांदा पिके पुष्कळ जास्त भावाने विकत घेण्यासाठी नवी केंद्रे राज्यभर सुरू करण्याचे ठरविले आहे..शेतकऱ्यांचे आंदोलन इतर राज्यांत (विशेषत: शेजारच्या राजस्थान व गुजरातमध्ये) पसरणार नाही यावर मोदी यांचा अस्तानाला रवाना होण्यापूर्वी भर होता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात पीककर्ज माफीची घोषणा आधीच झालेली असून त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे. मोदी यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राज्यांतील परिस्थितीकडे बघण्यास सांगण्यात आले आहे.