शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खरीप पिकाचे भाव वाढण्याची शक्यता

By admin | Updated: June 9, 2017 03:51 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे लोण वणव्यासारखे पसरू लागल्याने ते विझवण्यासाठी मोदी सरकार शक्य त्या सगळ््या उपायांचा विचार करीत आहे. त्यात खरीप पिकांच्या किंमतीत वाढ करणे, हा मार्ग असू शकतो. खरिपाच्या १४ पिकांशी संबंधित केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. खरीप पिकांच्या खरेदी किमतीत मोठी वाढ करण्याची सरकारची इच्छा आहे, असे दिसते. ही घोषणा पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली पॅरीसहून परतल्यावर केली जाऊ शकते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारताच्या इतर भागांत येत्या काही दिवसांत मान्सूनचा पाऊस आला की तेथील आंदोलन शांत होईल, अशीही सरकारला अपेक्षा आहे.मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन संवेदनशीलतेने हाताळण्यास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सांगण्यात आले आहे. मोदी यांनी परदेशी रवाना होण्यापूर्वी चौहान यांना फोन केला आणि गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये भरपाई जाहीर करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन शांत व्हावे, ते अन्यत्र पसरू नये, यासाठी मध्य प्रदेश सरकार डाळी आणि कांदा पिके पुष्कळ जास्त भावाने विकत घेण्यासाठी नवी केंद्रे राज्यभर सुरू करण्याचे ठरविले आहे..शेतकऱ्यांचे आंदोलन इतर राज्यांत (विशेषत: शेजारच्या राजस्थान व गुजरातमध्ये) पसरणार नाही यावर मोदी यांचा अस्तानाला रवाना होण्यापूर्वी भर होता. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात पीककर्ज माफीची घोषणा आधीच झालेली असून त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे. मोदी यांच्या अनुपस्थितीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राज्यांतील परिस्थितीकडे बघण्यास सांगण्यात आले आहे.