शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजकीय पक्ष ईव्हीएमला करतात बळीचा बकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:02 IST

प्रत्येक निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या (ईव्हीएम) नावाने खडे फोडणाऱ्या राजकीय पक्षांना मुख्य निवडणुक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी खडे बोल सुनावले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय पक्ष ईव्हीएमला बळीचा बकरा बनवतात कारण ते मशिन बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

कोलकाता : प्रत्येक निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या (ईव्हीएम) नावाने खडे फोडणाऱ्या राजकीय पक्षांना मुख्य निवडणुक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी खडे बोल सुनावले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय पक्ष ईव्हीएमला बळीचा बकरा बनवतात कारण ते मशिन बोलू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.रावत म्हणाले, जे राजकीय पक्ष आपला पराभव मनमोकळेपणाने स्वीकारू शकत नाही ते दुसºयांवर आरोप करतात. मतदानासाठी मतपत्रिका पुन्हा वापरात आणल्या जाण्याची अजिबात शक्यता नाही. ईव्हीएम यंत्रणेमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ज्या ज्या वेळी ईव्हीएमसंदर्भात आक्षेप घेतले गेले त्यावेळी निवडणुक आयोगाने त्याचे योग्य शब्दांत निराकरण केलेले आहे. निवडणुकीतील मतदान पद्धतीची पारदर्शकता व विश्वासार्हता वाढावी म्हणून यापुढे ईव्हीएमबरोबरच व्हेरिफिएबल पेपर ट्रान्सपरन्सी आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्रांचा वापर केला जाईल, हे गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले होते. देशात मतदान यंत्रणेचा व्याप मोठा असूनही मतमोजणीनंतर काही तासांतच निवडणूक आयोग निकाल जाहीर करतो ते या विश्वासार्ह यंत्रणेमुळेच....तर घटनादुरुस्ती करावी लागेलरावत म्हणाले की, लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यात याव्यात असा प्रस्ताव २०१५ साली केंद्र सरकारने दिला होता. त्यावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली होती. अशा एकत्र निवडणुका घेण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल तसेच कायदेही बदलावे लागतील. तेवढ्या प्रमाणात संसाधनेही उपलब्ध हवीत. हे सारे केंद्र सरकारला कळविले होते पण त्यानंतर काय झाले हे आयोगाला अद्याप कळलेले नाही.त्याची कल्पना नाहीमुदतपूर्व लोकसभा निवडणुका घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप निवडणूक आयोगाला काहीही कळविलेले नाही. कायद्यातील तरतुदीनूसार कोणत्याही सभागृहाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी त्याच्याशी संबंधित निवडणुकांची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाते.

टॅग्स :Politicsराजकारण