शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काश्मीरप्रश्नी तोडग्यासाठी राजकीय पक्षांनी एक व्हावे

By admin | Updated: August 23, 2016 05:08 IST

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला

हरिश गुप्ता,

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला. काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सगळ््या राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. गेल्या ४५ दिवसांपासून खोऱ्यात निर्माण झालेली अशांतता संपून सर्वसामान्य परिस्थिती निर्माण व्हावी, असे आवाहनही मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने मोदी यांच्याशी सोमवारी सकाळी सव्वा तास चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘‘२० जणांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने या चर्चेमध्ये केलेल्या विधायक सूचनांचे मोदी यांनी स्वागत केले व खोऱ्यातील लोकांच्या कल्याणाला सरकार बांधील असल्याचा पुनरुच्चार केला.’’ शिष्टमंडळात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जी. ए. मिर यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि माकपचे आमदार एम. वाय तरिगामी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मोदी यांच्या आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचीही भेट घेतली. ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की मोदी यांनी केलेल्या निवेदनाचे आम्ही स्वागत करतो. खोऱ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल. आतापर्यंत काश्मीरमधील हिंसाचारात ६७ जण ठार झाले आहेत. >सरकार पाठिशीखोऱ्यातील सध्याच्या अशांतेत ज्यांना जीव गमवावे लागले ते आमचे, आमच्या देशाचे होते. मग ते युवक असतील वा सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस. हे सगळेच दु:खदायक आहे. सरकार आणि देश जम्मू आणि काश्मीरच्या पाठिशी आहे. सगळ््या राजकीय पक्षांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना हा संदेश सांगावा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान