शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

काश्मीरप्रश्नी तोडग्यासाठी राजकीय पक्षांनी एक व्हावे

By admin | Updated: August 23, 2016 05:08 IST

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला

हरिश गुप्ता,

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र काळजी व दु:ख’ व्यक्त करून तेथील लोकांच्या जवळ जायचा प्रयत्न केला. काश्मीर प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सगळ््या राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. गेल्या ४५ दिवसांपासून खोऱ्यात निर्माण झालेली अशांतता संपून सर्वसामान्य परिस्थिती निर्माण व्हावी, असे आवाहनही मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने मोदी यांच्याशी सोमवारी सकाळी सव्वा तास चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘‘२० जणांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने या चर्चेमध्ये केलेल्या विधायक सूचनांचे मोदी यांनी स्वागत केले व खोऱ्यातील लोकांच्या कल्याणाला सरकार बांधील असल्याचा पुनरुच्चार केला.’’ शिष्टमंडळात नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जी. ए. मिर यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि माकपचे आमदार एम. वाय तरिगामी यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने मोदी यांच्या आधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचीही भेट घेतली. ओमर अब्दुल्ला यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले की मोदी यांनी केलेल्या निवेदनाचे आम्ही स्वागत करतो. खोऱ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल. आतापर्यंत काश्मीरमधील हिंसाचारात ६७ जण ठार झाले आहेत. >सरकार पाठिशीखोऱ्यातील सध्याच्या अशांतेत ज्यांना जीव गमवावे लागले ते आमचे, आमच्या देशाचे होते. मग ते युवक असतील वा सुरक्षा कर्मचारी किंवा पोलीस. हे सगळेच दु:खदायक आहे. सरकार आणि देश जम्मू आणि काश्मीरच्या पाठिशी आहे. सगळ््या राजकीय पक्षांनी लोकांमध्ये जाऊन त्यांना हा संदेश सांगावा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान