शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे - मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 06:03 IST

राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे आवश्यक आहे, जिथे सर्वांचे ऐकून घेतले जाईल, अशी पद्धत राजकीय पक्षांमध्ये असायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी

हरीश गुप्तानवी दिल्ली : राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे आवश्यक आहे, जिथे सर्वांचे ऐकून घेतले जाईल, अशी पद्धत राजकीय पक्षांमध्ये असायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस आणि गांधी परिवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. राजकीय पक्षांतील लोकशाही प्रक्रियेविषयी फारसे लिहिले जात नाही, अशी खंतही पंतप्रधानांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधी यांच्याकडून राहुल गांधी यांना देण्याची चर्चा सुरू असताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता, हे विधान केले. राजकीय पक्षांना मिळणाºया देणग्यांविषयी खूप काही लिहिले जाते, पण पक्षांतर्गत लोकशाहीचा उल्लेख केला जात नाही, असेही ते म्हणाले. भाजपाने पत्रकार व प्रसारमाध्यमांचे संपादक व प्रमुख यांच्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात व्यासपीठावर मोदी यांच्यासमवेत पक्षाध्यक्ष अमित शहा व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन हेच नेते होते.प्रसारमाध्यमांची प्रशंसामोदी यांच्या भाषणाचा बराच भाग प्रसारमाध्यमांचे कौतुक करणारा होता. स्वच्छ भारत मोहिमेला प्रसारमाध्यमांनी दिलेल्या पाठिंब्याची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, मी हल्ली सहजपणे भेटत नाही, अशी तुमच्यापैकी अनेकांची तक्रार असते. पूर्वी आनंदी वातावरण असायचे. आता तसे नसते. पण आता भेटणे अवघड होऊ न बसले आहे. पत्रकारांची संख्याही खूप वाढली आहे. त्यामुळे सर्वांना भेटणे, सर्वांशी संपर्क ठेवणे, हेच मोठे आव्हान झाले आहे. मुद्दाम भेटण्याचे टाळतो, असे नाही. पण भेटणे खरोखरच अवघड होत आहे.या कार्यक्रमात ते फार आनंदी वा उत्साही दिसत नव्हते. नेहमीप्रमाणे पत्रकारांमध्ये ते फार वेळ मिसळले नाहीत आणि त्यांच्याशी बोलतानाही खुलल्याचे दिसले नाही. कदाचित गुजरातच्या निवडणुकीचा तणाव हे त्याचे कारण असू शकते. अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. ताजमहाल वादाचा फायदा गुजरातमध्ये मिळेल, असे भाजपा नेत्यांना वाटत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी