शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'राजकीय पक्ष, व्यवसायसमूहाच्या वृत्तपत्रांकडून मूल्यांबाबत तडजोड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 02:49 IST

‘राजा राममोहन रॉय’ पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपल्या दुर्हेतूसाठी स्वत:ची वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या सुरू करून पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केले. पत्रकारांनी सनसनाटीपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात नायडू बोलत होते. पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘राजस्थान पत्रिका समूहा’चे चेअरमन आणि ‘एडिटर इन चीफ’ गुलाब कोठारी यांना उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते ‘राजा राममोहन रॉय’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.नायडू यांनी सांगितले की, अलीकडे राजकीय पक्ष आणि व्यवसाय समूह आपली स्वत:ची वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या सुरू करीत आहेत. या माध्यमातून ते आपले दुर्हेतू (व्हेस्टेड इंटरेस्ट) साध्य करीत आहेत, तसेच पत्रकारितेच्या मूल्यांबाबत तडजोड करीत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाकडून वृत्तपत्र चालविले जात असेल, तर तसे त्यांनी स्पष्टपणे नमूदही करायला हवे. सनसनाटीपणाच्या या काळात सतर्क राहण्याचे आवाहन पत्रकारांना करून नायडू यांनी पुढे म्हटले की, सनसनाटी हे जणू आजचे ब्रीदच बनले आहे. तथापि, सनसनाटी बातमी म्हणजे असंवेदनशील बातमी होय. सनसनाटीपासून पत्रकारांनी दूर राहायला हवे.खोट्या बातम्या ही मोठी समस्या -जावडेकरमाहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. जावडेकर यांनी खोट्या बातम्यांबाबत चिंता व्यक्त केली. जावडेकर म्हणाले की, आज ‘पेड न्यूज’पेक्षाही ‘फेक न्यूज’ ही मोठी समस्या बनली आहे. पत्रकारांनी आपल्या स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही समजून घेण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू