शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

राजकीय नेत्याने असं विधान करणं अयोग्य; राहुल गांधींच्या टीकेला सुषमा स्वराज यांचं प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:18 IST

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

ठळक मुद्दे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. त्यालाच सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं.

अहमदाबाद- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.  आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. त्यालाच सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं. एका राजकीय नेत्याने असं विधान करणं अयोग्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हंटलं आहे. भाजपा आणि संघ महिलाविरोधी असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘भाजपाने देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल, 6 केंद्रीय मंत्री दिल्या आहेत,’ असं स्वराज यांनी म्हटलं. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुषमा स्वराज बोलत होत्या.

भाजपा आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. ‘संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला हाफ पॅन्टमध्ये पाहिलं आहे का?,’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. याबद्दल सुषमा स्वराज यांना अहमदाबादमधील कार्यक्रमात एका तरुणीने त्यांची प्रतिक्रिया विचारली. ‘राहुल गांधींचं विधान मला पटलं नाही. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरायला नको होती. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न एका तरुणीने सुषमा स्वराज यांना विचारला होताना. ‘तुम्हाला जे वाटले, तेच मलाही वाटलं. एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींनी त्या पद्धतीची भाषा वापरायला नको होती. ते आता पक्षाचे अध्यक्ष होणार, अशीही चर्चा आहे. पण त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरुर उत्तर दिलं असते',असं सुषमा स्वराज यांनी म्हंटलं आहे. 

‘आमच्या सरकारआधी कधीही एखादी महिला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची सदस्य झाली नव्हती. भाजपा सरकारच्या काळात या कमिटीतील ५ पैकी दोन सदस्य या महिला आहेत,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी राहुल गांधींच्या यांच्या टीकेला उत्तर दिलं. 

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. आरएसएसच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का, असा प्रश्न राहुल यांनी विचारला. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कधी बघितलंय का कुणी महिलांना या शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी, अशी विचारणा त्यांनी केली. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजRahul Gandhiराहुल गांधी