शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

‘पुरस्कार वापसी’ हा राजकीय कट - RSS

By admin | Updated: October 31, 2015 08:40 IST

पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे.

रांची : पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे आणि ही टोळी केवळ आपली राजकीय दुकानदारी चालविणे आणि चर्चेत येण्यासाठीच असे करीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साहित्यिक, लेखक, चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वर तोफ डागली आहे.संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी शुक्रवारी रांची येथे पत्रकारांशी बोलताना वरीलप्रमाणे टीकास्त्र सोडले. देशाच्या विविध क्षेत्रातील लोकांकडून पुरस्कार परत केले जाण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना होसबळे म्हणाले, ‘जे लोक देशात ६० वर्षांपासून असहिष्णुतेचा नंगानाच करीत होते, ते आता षड्यंत्र रचत आहेत आणि संघ व भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’होसबळे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीनिमित्त रांची येथे आले आहेत. हा मोदी सरकार आणि संघाला विनाकारण घेरण्याचा राजकीय कट आहे, ज्यात हे मुठभर तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक पुरस्कार परत करण्याचे राजकारण करून कधीही शयस्वी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. होसबळे पुढे म्हणाले, ‘लोकांनी त्यांचे विचार ऐकणेही बंद केलेले आहे. परिणामी आपले दुकान पुन्हा चमकविण्यासाठी हे लोक असे वागत आहेत. पुरस्कार परत करणाऱ्यांची ओळख आणि विश्वासार्हता काय आहे? ते जर शास्त्रज्ञ असतील तर एखाद्या शास्त्रज्ञांच्या चर्चेत का सहभागी होत नाहीत?’ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी गुरुवारी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता. त्याबद्दल विचारले असता होसबळे लगेच म्हणाले, ‘त्यांनी कोणत्या वैज्ञानिक विषयावर चर्चा केली आहे? देशात गेल्या अनेक दशकांपासून झालेल्या असहिष्णुतेच्या काळात ते आणि त्यांच्यासारखे लोक कुठे होते? त्यांनी पुरस्कार का परत केले नाही? संघ काही ‘पंचिंग बॅग’ नाही, जिला कुणीही काहीही बोलत राहावे आणि कसलेही आरोप करीत राहावे, असे निक्षून सांगत होसबळे म्हणाले, अशा मुठभर साहित्यिक, चित्रपट निर्मात्यांच्या चुकीच्या वक्तव्याने संघाची प्रतिमा खराब होऊ शकत नाही. देशाच्या जनतेला सर्वकाही कळते.’ (वृत्तसंस्था)मुंबई : विधायक टीका करून सरकारला मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देशभरातील लेखक, साहित्यिक आणि शास्त्रज्ञ देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल संताप व्यक्त करीत आपले पुरस्कार परत करीत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’मध्ये आपले मत मांडले.‘लेखक, साहित्यिक व शास्त्रज्ञ आपापले पुरस्कार परत करीत आहेत, ही अतिशय दु:खद बाब आहे. आम्ही (सरकार या नात्याने) त्यांचा खूप आदर करतो. दादरी हत्याकांडानंतर त्यांनी पुरस्कार परत करायला सुरुवात केली आहे. दादरीची घटना अतिशय दुर्दैवी आहे व अशा घटना पुन्हा घडायला नको, असे मला वाटते,’ असे फडणवीस म्हणाले.