शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

‘पुरस्कार वापसी’ हा राजकीय कट - RSS

By admin | Updated: October 31, 2015 08:40 IST

पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे.

रांची : पुरस्कार परत करणारी ‘गँग’ ही लोकांनी ज्यांचे विचार ऐकणे बंद केले आहे अशा हताश, निराश आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांची टोळी आहे आणि ही टोळी केवळ आपली राजकीय दुकानदारी चालविणे आणि चर्चेत येण्यासाठीच असे करीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साहित्यिक, लेखक, चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी केलेल्या ‘पुरस्कार वापसी’वर तोफ डागली आहे.संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी शुक्रवारी रांची येथे पत्रकारांशी बोलताना वरीलप्रमाणे टीकास्त्र सोडले. देशाच्या विविध क्षेत्रातील लोकांकडून पुरस्कार परत केले जाण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना होसबळे म्हणाले, ‘जे लोक देशात ६० वर्षांपासून असहिष्णुतेचा नंगानाच करीत होते, ते आता षड्यंत्र रचत आहेत आणि संघ व भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’होसबळे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीनिमित्त रांची येथे आले आहेत. हा मोदी सरकार आणि संघाला विनाकारण घेरण्याचा राजकीय कट आहे, ज्यात हे मुठभर तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक पुरस्कार परत करण्याचे राजकारण करून कधीही शयस्वी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. होसबळे पुढे म्हणाले, ‘लोकांनी त्यांचे विचार ऐकणेही बंद केलेले आहे. परिणामी आपले दुकान पुन्हा चमकविण्यासाठी हे लोक असे वागत आहेत. पुरस्कार परत करणाऱ्यांची ओळख आणि विश्वासार्हता काय आहे? ते जर शास्त्रज्ञ असतील तर एखाद्या शास्त्रज्ञांच्या चर्चेत का सहभागी होत नाहीत?’ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी गुरुवारी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला होता. त्याबद्दल विचारले असता होसबळे लगेच म्हणाले, ‘त्यांनी कोणत्या वैज्ञानिक विषयावर चर्चा केली आहे? देशात गेल्या अनेक दशकांपासून झालेल्या असहिष्णुतेच्या काळात ते आणि त्यांच्यासारखे लोक कुठे होते? त्यांनी पुरस्कार का परत केले नाही? संघ काही ‘पंचिंग बॅग’ नाही, जिला कुणीही काहीही बोलत राहावे आणि कसलेही आरोप करीत राहावे, असे निक्षून सांगत होसबळे म्हणाले, अशा मुठभर साहित्यिक, चित्रपट निर्मात्यांच्या चुकीच्या वक्तव्याने संघाची प्रतिमा खराब होऊ शकत नाही. देशाच्या जनतेला सर्वकाही कळते.’ (वृत्तसंस्था)मुंबई : विधायक टीका करून सरकारला मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देशभरातील लेखक, साहित्यिक आणि शास्त्रज्ञ देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल संताप व्यक्त करीत आपले पुरस्कार परत करीत आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’मध्ये आपले मत मांडले.‘लेखक, साहित्यिक व शास्त्रज्ञ आपापले पुरस्कार परत करीत आहेत, ही अतिशय दु:खद बाब आहे. आम्ही (सरकार या नात्याने) त्यांचा खूप आदर करतो. दादरी हत्याकांडानंतर त्यांनी पुरस्कार परत करायला सुरुवात केली आहे. दादरीची घटना अतिशय दुर्दैवी आहे व अशा घटना पुन्हा घडायला नको, असे मला वाटते,’ असे फडणवीस म्हणाले.