शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

इंजेक्शनद्वारे देण्यात येणार पोलिओची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 06:56 IST

देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले.

नवी दिल्ली- देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाते. त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येणार असल्याचे महापालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केले. पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले. सध्या देशात पोलिओच्या रुग्णांमध्ये पी १ विषाणू बाधित रुग्णांची संख्या अधिक असून पी ३ विषाणू बाधित रुग्णदेखील आहेत. आता पी २ विषाणूमुळे पोलिओ होण्याचा धोका राहिलेला नाही. या आधी ३ लसी एकत्र करुन दिल्या जात होत्या. आता २ लसी एकत्र करुन दिल्या जाणार आहेत.