शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पोलीस स्टेशनवर अतिरेकी हल्ला, ३ शहीद

By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या पोशाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले,

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या पोशाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले, तर एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले. पोलिसांनीही दुपारपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गेल्या १ मार्च रोजी राज्यात पीडीपी-भाजप युती सरकारने सत्तासूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार दोन आत्मघाती दहशतवादी राजबाग पोलीस ठाण्यात घुसले आणि तुफान गोळीबार सुरू केला. यापूर्वी पोलिसांनी दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जण ठार झाले असल्याचे म्हटले होते. मृत दहशतवाद्यांजवळून काही महत्त्वाचे दस्तावेज आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले सीआरपीएफचे जवान भरत प्रभू यांनी सांगितले की, लष्करी वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी जम्मूहून पठाणकोटला जाणाऱ्या एका जीपला चौकशीच्या कारणावरून थांबविले. त्यानंतर ती जीप ताब्यात घेऊन थेट राजबाग पोलीस स्टेशनला पोहोचले आणि सुरक्षेत तैनात जवानाला गोळ्या घालून ठार केले. पोलीस ठाण्यावर ग्रेनेड फेकून अंदाधुंद गोळीबार केला. पोलीस ठाण्यातील दृश्य एखाद्या रणांगणाप्रमाणे झाले होते. हल्ल्याचे वृत्त कळताच तातडीने अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठविण्यात येऊन जम्मू-पठाणकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. (वृत्तसंस्था)जम्मू-काश्मीर विधानसभेतही या हल्ल्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी या घटनेबाबत सरकारला उत्तर मागितले. नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य देवेंद्रसिंग राणा यांनी हा मुद्दा उपस्थित करून असे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कुठली उपाययोजना केली आहे? असा सवाल केला. माकपचे एम.वाय. तारीगामी यांनी हल्ल्याची निंदा करून अशा प्रसंगांना आपण एकजूट असले पाहिजे, असे मत मांडले. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुद्धा हल्ल्याचा निषेध केला. असे हल्ले यापूर्वीही झाले असून या मार्गाचाही त्यांनी वारंवार वापर केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने भूतकाळात झालेल्या अशा हल्ल्यांमधून धडा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कठुआ आणि सांबा जिल्ह्यात २०१३ आणि २०१४ मध्ये पोलीस ठाणी आणि लष्करी शिबिरांवर अशाप्रकारचे हल्ले झाले होते. राष्ट्रपतींनी केली निंदा; सतर्क राहण्याचे आवाहनराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जम्मूतील दहशतवादी हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. सुरक्षा दलांना देशाची शांतता आणि सुरक्षेला असलेल्या कुठल्याही धोक्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन राष्ट्रपती मुखर्जी यांनी केले आहे. संसदेत चर्चा; सरकारची कोंडीठाण्यावरील दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.लोकसभेत काँग्रेसने या हल्ल्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करून मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांचे धोरण तर याला कारणीभूत नाही ना, असा सवाल केला. हल्लेखोर आत्मघाती दहशतवाद्यांना यमसदनी धाडणारे जम्मू-काश्मीरचे पोलीस आणि जवानांच्या पराक्रमाची गृहमंत्री सिंग यांनी प्रशंसा केली. सोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या हल्ल्याची माहिती दिली. यावर संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी या हल्ल्याबाबत सरकारला संपूर्ण माहिती असून आपण गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याचे स्पष्ट केले. सुरक्षा दलाची कारवाई अजूनही सुरू असल्याने तूर्तास गृहमंत्र्यांनी निवेदन देणे योग्य नाही,असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)