शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

केजरीवालांच्या घरी शिरले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:03 IST

दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ते तेथे गेले होते.संतप्त केजरीवाल यांनी त्यानंतर सवाल केला आहे की, मोठ्या संख्येने पोलीस माझ्या घरी पाठविण्यात आले. घराची झडती सुरू आहे. या चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? दिल्ली सरकारचे प्रवक्ते अरुणोदय प्रकाश यांनी सांगितले की, जवळपास ६० ते ७०पोलीस कर्मचाºयांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हे निवासस्थानच त्यांनी ताब्यातघेतले. कोणतीही सूचना नदेता हे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसले. पोलीसराजने दिल्लीच्या लोकशाहीची हत्या केली आहे. ते मुख्यमंत्र्यांशी असे वागत असतील तर, गरीब लोकांबाबत ते काय करू शकतात? केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठकीच्या वेळी मुख्य सचिवांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपचे आ. प्रकाश जारवाल व अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? - अरविंद केजरीवालमुख्यमंत्री केजरीवाल यांचे सल्लागार व्ही. के. जैन यांच्यावर जबाब बदण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप आपने केला. आशुतोष व संजय सिंह यांनी दावा केला की, आप सरकार अस्थिर करण्याचे हे कारस्थान आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल हे भाजपाचे एजंट असल्याची टीका त्यांनी केली. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात जैन यांनी त्या घटनेच्या वेळी शौचालयात होतो व नेमके काय झाले हे आपणास माहीत नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. आशुतोष म्हणाले की, मुख्य सचिवांनी आपल्यावर रात्री १२ वाजता ह्ल्ला झाल्याचा आरोप केला आहे. मात्र ते ११.३0 वाजता मुख्यमंत्र्यांच्या घरातून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, असा दावा आशुतोष यांनी केला.सनदी अधिकारी पीएमओमध्येमुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर दिल्ली सरकारमधील सनदी अधिकाºयांचे शिष्टमंडळ शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले आणि आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, हे अधिकारी कार्मिक मंत्रालयासमोर आपल्या तक्रारी नोंदवू इच्छित होते. कार्मिक मंत्रालय हे भारतीय प्रशासकीय सेवेवर नियंत्रण ठेवते.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल