शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
3
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
4
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
5
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
6
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
7
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
8
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
9
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
10
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
11
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
12
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
13
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
14
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
15
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
16
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
17
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
18
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
19
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
20
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची डोकेदुखी वाढली कत्तलखान्याचा प्रश्न : झेंडीगेटमध्ये तणाव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जामखेड रोडमार्गे दहा ते पंधरा गायी असलेला एक टेम्पो झेंडीगेट भागातील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसला. या टेम्पोतील गायी कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे शंभरावर कार्यकर्ते झेंडीगेटमध्ये आले. तेथून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोर्चा वळविला. गायी सोडविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कोतवाली पोलिसांनी दहा ते पंधरा पोलिसांची कुमक झेंडीगेटकडे पाठविली. कार्यकर्ते आणि कुरेशी समाजातील खाटीक यांच्यात पोलिसांनी समेट घडवून आणल्याने वाद निवळला.
नगर तालुका पोलिस ठाणे हे कुरेशी गल्लीमध्येच असले तरी या ठाण्यात पोलसांची कुमक कमी असल्याने त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती देऊन पोलीसबळ पाठविण्याची मागणी केली. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र गायी सोडविण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------
महापालिका उदासीन
शहराच्या बाहेर कत्तलखान्याची जागा शोधणे, अत्याधुनिक जागेवर बांधकाम करणे आणि शहराच्या काही भागात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत काहीच हालचाली करीत नसल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या बाहेर कत्तलखाना निर्मिती करण्याचा विषय दरवर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याने अनेक वर्षांपासून कत्तलखान्याचा विषय रखडलेला आहे.
-------------
वडगाव गुप्ता येथे जागा
शहराबाहेरील वडगाव गुप्ता भागात महापालिकेचा जुना कोंडवाडा असलेल्या जागेत कत्तलखाना करण्याबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये अनेकवेळा चर्चेला आला होता. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच शहरातील अनधिकृत कत्तलखाना चालविणार्‍यांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने शहरात तेढ निर्माण झाली आहे.