शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पोलिसांची डोकेदुखी वाढली कत्तलखान्याचा प्रश्न : झेंडीगेटमध्ये तणाव

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.

अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.
मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जामखेड रोडमार्गे दहा ते पंधरा गायी असलेला एक टेम्पो झेंडीगेट भागातील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसला. या टेम्पोतील गायी कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे शंभरावर कार्यकर्ते झेंडीगेटमध्ये आले. तेथून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोर्चा वळविला. गायी सोडविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कोतवाली पोलिसांनी दहा ते पंधरा पोलिसांची कुमक झेंडीगेटकडे पाठविली. कार्यकर्ते आणि कुरेशी समाजातील खाटीक यांच्यात पोलिसांनी समेट घडवून आणल्याने वाद निवळला.
नगर तालुका पोलिस ठाणे हे कुरेशी गल्लीमध्येच असले तरी या ठाण्यात पोलसांची कुमक कमी असल्याने त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती देऊन पोलीसबळ पाठविण्याची मागणी केली. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र गायी सोडविण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------
महापालिका उदासीन
शहराच्या बाहेर कत्तलखान्याची जागा शोधणे, अत्याधुनिक जागेवर बांधकाम करणे आणि शहराच्या काही भागात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत काहीच हालचाली करीत नसल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या बाहेर कत्तलखाना निर्मिती करण्याचा विषय दरवर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याने अनेक वर्षांपासून कत्तलखान्याचा विषय रखडलेला आहे.
-------------
वडगाव गुप्ता येथे जागा
शहराबाहेरील वडगाव गुप्ता भागात महापालिकेचा जुना कोंडवाडा असलेल्या जागेत कत्तलखाना करण्याबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये अनेकवेळा चर्चेला आला होता. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच शहरातील अनधिकृत कत्तलखाना चालविणार्‍यांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने शहरात तेढ निर्माण झाली आहे.