शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पोलिस ड्रग्स जाळतात की गायीचे शेण - सुप्रीम कोर्टाचा खोचक सवाल

By admin | Updated: August 31, 2015 15:52 IST

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३१ - जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. विद्यमान व्यवस्थेत जप्त केलेले अंमली पदार्थ ठेवण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्पष्ट नियमावली नसल्याचे ताशेरेही कोर्टाने केंद्र व राज्य सरकारवर ओढले आहेत. 
अंमली पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. देशात जप्त झालेल्या अंमली पदार्थांपैकी अवघ्या ५ ते १० टक्के अंमली पदार्थच नष्ट केले जातात अशी माहिती कोर्टात देण्यात आली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पोलिसांसोबतच केंद्र व राज्य सरकारला खडे बोल सुनावले.  ४० कोटी, ५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिस करतात, पण हे अंमली पदार्थ शेवटी जातात कुठे, पुरावा म्हणून कोर्टात अंमली पदार्थांचे नमुन दिले जातात, मग उर्वरित अंमली पदार्थाचे काय होते, पोलिस खरंच अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण जाळतात असे असंख्य प्रश्नच कोर्टाने उपस्थित केले. पोलिस दलातील हवालदार, कॉन्स्टेबल, शिपाई या सारख्या कनिष्ठ पदावरील कर्मचारीच हे अंमली पदार्थ पुन्हा बाजारात विकत असल्याच्या घटना घडल्या आहेत याकडेही कोर्टाने लक्ष वेधले. पोलिसांच्या मालखान्याचीही दुरावस्था झाल्याने जप्त केलेला माल सुरक्षित कसा राहणार असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.