शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिस ड्रग्स जाळतात की गायीचे शेण - सुप्रीम कोर्टाचा खोचक सवाल

By admin | Updated: August 31, 2015 15:52 IST

जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३१ - जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. विद्यमान व्यवस्थेत जप्त केलेले अंमली पदार्थ ठेवण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्पष्ट नियमावली नसल्याचे ताशेरेही कोर्टाने केंद्र व राज्य सरकारवर ओढले आहेत. 
अंमली पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. देशात जप्त झालेल्या अंमली पदार्थांपैकी अवघ्या ५ ते १० टक्के अंमली पदार्थच नष्ट केले जातात अशी माहिती कोर्टात देण्यात आली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पोलिसांसोबतच केंद्र व राज्य सरकारला खडे बोल सुनावले.  ४० कोटी, ५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिस करतात, पण हे अंमली पदार्थ शेवटी जातात कुठे, पुरावा म्हणून कोर्टात अंमली पदार्थांचे नमुन दिले जातात, मग उर्वरित अंमली पदार्थाचे काय होते, पोलिस खरंच अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण जाळतात असे असंख्य प्रश्नच कोर्टाने उपस्थित केले. पोलिस दलातील हवालदार, कॉन्स्टेबल, शिपाई या सारख्या कनिष्ठ पदावरील कर्मचारीच हे अंमली पदार्थ पुन्हा बाजारात विकत असल्याच्या घटना घडल्या आहेत याकडेही कोर्टाने लक्ष वेधले. पोलिसांच्या मालखान्याचीही दुरावस्था झाल्याने जप्त केलेला माल सुरक्षित कसा राहणार असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.