शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

PNB fraud: नीरव मोदीच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी लावली होती हजेरी; भाजपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 18:10 IST

भाजपा खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवत आहे.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11,300 कोटींच्या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचे सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना भाजपाकडून शनिवारी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवरील सर्व आरोपांचे खंडन केले. उलट त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचेच एकमेकांशी कशाप्रकारचे साटेलोटे आहे, याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, नीरव मोदी याच्या गीतांजली जेम्सला 2013 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार करण्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, तरीही त्यावेळी राहुल गांधी यांनी गीतांजली जेम्सच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशीही काँग्रेस नेत्यांचा संबंध आहे. नीरव मोदीने अद्वैत होल्डिंग्सकडून मुंबईतील मालमत्ता लीझ करारावर घेतली होती. त्यावेळी काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची पत्नी अनिता सिंघवी या कंपनीच्या समभागधारक होत्या. त्यामुळे  काँग्रेसने त्यावेळी हा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निर्मला सीतारामन यांनी केला. निर्मला सितारामन यांच्या आरोपांनंतर अभिषेक सिंघवी यांनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले. माझ्या पत्नीचा किंवा मुलाचा नीरव मोदी यांच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. भाजपा खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवत आहे. त्यामुळे मी निर्मला सितारामन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानाची खटला दाखल करण्याच्या विचार करत आहे, असे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनीही भाजपावर पीएनबी घोटाळ्यावरून पुन्हा एकदा टीका केली. आमच्या देशाचे चौकीदार इतरांना भजी तळण्याचे सल्ले देतात. हा चौकीदार झोपल्यामुळेच चोर पळून गेला. पंतप्रधान आपल्या परदेशातील दौऱ्यातील सहकाऱ्यांची नावे जाहीर करत नाहीत. पंतप्रधानांना ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून हेच अपेक्षित आहे का, असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदीRahul Gandhiराहुल गांधी